Locus Krushi Services Pvt. Ltd

Locus Krushi Services Pvt. Ltd Rashtriya Falotpadan Abhiyanaantargat Samuhik Shettale Hi Yojana 100% Anudanavar Rabvinyat Yet Aahe. Ekatmik Annadravya/Kid Vyavasthapan: Kharch 2000Rs./Ha.

काही प्रातिनिधिक SMS (लघू संदेश) नमुने:
1. शासकीय योजना
उदा. 1: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळे ही योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. संपर्क:तालुका कृषी अधिकारी. Sampark: Taluka Krushi Adhikari

उदा. 2: केळी नवीन बाग योजना: खर्च(टिश्यु कल्चर) रु.83204/ हे, लागवड अंतर 1.8x1.8m,समूहतत्वावर अनुदान खर्चाच्या 50%, संपर्क:तालुका कृषी अधिकारी
Keli Navin Bag Yojana: Kharch(Ti

ssue Culture) Rs.83204/Ha, Lagvad Antar 1.8x1.8m, Samuhtatvavar Anudan Kharchachya 50%, Sampark: Taluka Krushi Adhikari

उदा. 3: एकात्मिक अन्नद्रव्य/कीड व्यवस्थापन: खर्च 2000रु./हे. अनुदान 50%. लाभार्थी क्षेत्र/4हे. पर्यंत (बँक कर्जाशी निगडीत)संपर्क:कृषी अधिकारी. Anudan 50%. Labharthi Kshetra/4ha.Paryant (Bank Karjashi Nigadit) Sampark: Krushi Adhikari.

2. बाजारभाव
उदा. 1: 21/3/2014 -कापूस (Q): बीड:4800-5000, गेवराई:4500-4800, कडी:4960-5475
उदा. 2: 20/3/2014 -सोया प्लांट (Q): अंबिका(अकोला):3950, भक्ति ( जालना):4125, नर्मदा (वाशिम):4000
उदा. 3: 20/3/2014 -हरभरा(Q): अकोट:2500-2900, कारंजा:2590-2885, अमरावती:2800-2950

3. स्थानिक हवामान
उदा. 1: पावसाची शक्यता अमरावती जिल्हा: 23 फेब्रुवारी:1-5mm, 24 फेब्रुवारी: 1mm. Pavsachi Shakyata- Amravati Jilha: 23 February:1-5mm, 24 फेब्रुवारी : 1mm.

उदा. 2: पावसाची शक्यता अकोला जिल्हा: 23 फेब्रुवारी:1-6mm, 24:1 फेब्रुवारी: 2mm. Pavsachi Shakyata Akola: Jilha: 23 February: 1-6mm, 24:1 फेब्रुवारी: 2mm

उदा. 3: पावसाची शक्यता औरंगाबाद जिल्हा: 23 फेब्रुवारी: 1mm. Pavsachi Shakyata Aurangabad Jilha: 23 February: 1mm

4. तेजी-मंदी
उदा. 1: मका: भारतीय मक्याची मागणी वाढल्याने दरात 50रु. /Q पर्यंत तेजी येण्याची शक्यता, तसेच पाऊस थांबल्याने 15 एप्रिल पर्यंत आवक वाढणार. Maka: Bhartiy Makyachi Magani Vadhalyane Darat 50Rs./Q Paryant Teji Yenyachi Shakyata, Tasech Pavus Thamblyane 15 April Paryant Aavak Vadhnar.

उदा. 2: सोयाबीन: अमेरिकेत तेजी थांबल्याने तसेच चीनकडील मागणी कमी झाल्याने भारतीय किमतीत दीड टक्क्याने घट. मार्चनंतर अजून घट होण्याची शक्यता. Soyabin: Ameriket Teji Thamblyane Tasech Chinkadil Magani Kami Zalyane Bhartiy Kimtit Did Takkyane Ghat. Marchnantar Ajun Ghat Honyachi Shakyata.

उदा. 3: सोयाबीन: मध्यप्रदेश मध्ये यंदा उत्पादनात घट झाल्याने महाराष्ट्रातील दरात तेजी कायम असून अजून वाढ होण्याची शक्यता.चालू दर 3900-4000Rs/Q
Soyabin: Madhya Pradesh Madhye Yanda Uttpadanat Ghat Zalyane Maharashtratil Darat Teji Kayam Asun Ajun Vadh Honyachi Shakyata. Chalu Dar 3900-4000Rs/Q.

उदा. 4: मका: अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने तसेच विदेशातून चांगल्या मालाची मागणी वाढल्याने दरात तेजी होवून 1330-1340Rs/Q. होण्याची शक्यता. Maka: Avakali Pavasamule Nuksan Zalyane Tasech Videshatun Changalya Malachi Magani Vadhalyane Darat Teji Hovun 1330-1340Rs/Q. Honyachi Shakyata.

5. कृषीविषयक घडामोडी व बातम्या.
उदा. 1: गारपीटग्रस्तांसाठी 4,000 कोटींची मदत जाहीर. कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी 10,000रू. बागायती 15,000 रु.फळबागांसाठी 25,000रु.प्रती हेक्टर. Garpitagrasthansathi 4,000 Kotinchi Madat Jahir. Koradvahu Shetkaryansathi 10,000Rs. Bagayati 15,000 Rs.Fhalbangansathi 25,000 Rs.Prati Hector.

उदा. 2: कोल्हापूर आणि मुझफ्फरनगर या प्रमुख साखर उद्योग बाजारपेठेत साखर दरात 12% ने वाढ झाली असून अनुक्रमे दर 2,943रु. व 3,307रु.प्रती क्विंटल. Kolhapur Aani Muzaffarnagar Ya Pramukh Sakhar Udyog Bajarpethet Sakhar Darat 12% Ne Vadh Zali Asun Anukrame Dar 2,943Rs. Va 3,307 Rs.Prati Quintal.

उदा. 3: पश्‍चिम घाट(नगर,धुळे,कोल्हापूर,नाशिक,पुणे,रायगड,रत्नागिरी,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,ठाणे) पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित:केंद्र सरकार
New Delhi: Paschim Ghatatil Nagar,Dhule,Kolhapur,Pune,Raigad,Ratnagiri,Sangali,Satara,Sindhudurga, Thane He Zilhe Paryavarandrushtya Sanvedanshil Ghosh*t, Yamule Ya Bhanganmadhe Khan-kam,Anu-urja Prakalp Aani Paryavaran Khatyachya “Red” Yadimadhye Samavistha Asalelya Udyoganna Bandi Asel: Kendra Sarkar

6. पिकांविषयी पिकसल्ला व माहिती
उदा. 1: डाळिंब:फुलधारणेच्या काळात ताजे शेण 20kg+ जनावरांचे मुत्र10Lit.+निंबोळी पेंड 15Kgची स्लरी बनवून प्रती एकरी15 दिवसांच्या अंतराने द्यावी. Dalimb Fuladharanechya Kalat Taje Shen 20kg + Janavaranche Mutr 10liter + Nimboli Pend 15kg Chi Slari Banavun Prati Aceri 15 Divasanchya Antarane Dyavi.

उदा. 2: सुरु ऊस: हरितद्रव्य निर्मितीत वाढ होण्यासाठी हेक्टरी 60 किलो गंधक हे अमोनियम सल्फेट, मुलद्रवी गंधक, जिप्सम/प्रेसमड केक द्वारे द्यावे. Suru Uus: Haritdravya Nirmitit Vadh Honyasathi Hectari 60 Kilo Gandhak He Ammonium Sulfate, Muldravi Gandhak, Gypsum Kinva Pressmud Cake Dvare Dyave.

उदा. 3: द्राक्ष: वेलीच्या क्षमतेहून जादा उत्पन्न घेणे टाळावे. वेलीवर द्राक्ष घड संख्या जादा असेल तर फुटीची वाढ कमी होउन विस्तार मर्यादित राहतो
Draksh: Velichya Kshamatehun Jada Utpanna Ghene Talave. Velivar Draksh Ghad Sankhya Jada Asel Tar Phutichi Vadh Kami Houn Vistar Maryadit Rahato.

7. जनावरांसंबंधीत माहिती/सल्ला.
उदा. 1: माजाच्या वेळी योनीमार्गातून बाहेर पडणारा स्त्राव चिकट, स्वच्छ, पारदर्शक नसल्यास पशु वैद्यकाकडून गर्भाशयाचा दाह आहे का तपासावे. Majachya Veli Yonimargatun Baher Padanara Strav Chikat, Svachchh, Pardarshak Nasalyas Pashu Vaidyakakadun Garbhashayacha Dah Aahe Ka Tapasave.

उदा. 2: बंदिस्त गोठा पद्धतीपेक्षा मुक्त गोठा पद्धतीत जनावरे मोकळी असल्याने चांगले आरोग्य, कास सुजीचे प्रमाण तसेच खुराचे आजार कमी होतात. Bandist Gotha Padhdtipeksha Mukt Gotha Padhdatit Janavare Mokali Asalyane Aarogya, Kas Sujiche Praman Tasech Khurache Aajar Kami Hotat.

उदा. 3: धारा पूर्ण हात पद्धतीने काढव्यात, शेवटचे दुध बोटाच्या चिमटीने पिळावे, अंगठा मुडपून धारा काढू नये त्यामुळे सडावर जखमा होतात. Dhara Purn Hat Padhdatine Kadhavyat, Shevatache Dudh Botachya Chimatine Pilave, Angatha Mudapun Dhara Kadhu Naye Tyamule Sadavar Jakhama Hotat.

31/05/2016

आजचा शेती सल्ला: झेंडू लागवड तंत्र

झेंडूची लागवड वर्षभरात तीनदा (खरीप, रब्बी व उन्हाळी) करता येत असल्याने वर्षभर फुलांचे उत्पादन मिळू शकते. लागवडीआधी जमीन एकसारखी सपाट व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. खरीप हंगामात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर उन्हाळी व रब्बी हंगामात उंच सपाट वाफ्यांत लागवड करावी.
लागवडीनंतर ३०-४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. पूर्ण लागवड करताना शक्‍यतो दुपारनंतर करावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. पूर्ण लागवडीनंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.

रोपवाटिका तयार करताना -
गादीवाफा तयार करावा. या गादीवाफ्याची रुंदी ६०-७६ सें.मी. व उंची १५ ते २० सें.मी. असावी. गादीवाफ्याची लांबी, लागवडीच्या क्षेत्रानुसार व उपलब्ध जागेनुसार असावी. साधारणतः एक एकर लागवडीसाठी तीन मी. लांब व ६० सें.मी. रुंदीचे सहा-आठ गादीवाफे लागतात.

गादीवाफ्यासाठी जमीन भुसभुशीत करावी. त्यात १५ ते २० किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत व २५ ग्रॅम डीएपी प्रति गादीवाफा टाकावे. गादीवाफ्यावर बियाणे टाकताना दोन ओळींत चार-पाच सें.मी. अंतर ठेवावे. बियाण्याची खोली दोन-तीन सें.मी. ठेवावी.

बियाणे पेरल्यानंतर गादीवाफ्यावर सुपीक माती व वाळू पसरावी. त्यानंतर गादीवाफा वाळलेल्या धानाच्या कडब्याने झाकून घ्यावा. बियाण्यांची उगवण होईपर्यंत गादीवाफ्यास झारीच्या साह्याने पाणी द्यावे. बियाणे पेरणीनंतर चार-पाच दिवसांनी उगवण दिसून येते.

झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, यांतील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.
हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.

आफ्रिकन झेंडू -
प्रमुख जाती - १) क्रॅकर जॅक, २) अलास्का, ३) ऑरेंज ट्रेझन्ट, ४) आफ्रिकन टॉल डबल मिक्‍स्ड
फ्रेंच झेंडू - महत्त्वाच्या जाती: १) स्प्रे, २) लेमन ड्रॉप्स, ३) फ्रेंच डबल मिक्‍स्ड
संकरित झेंडू -
जाती - १) पिटाईट, २) जिप्सी, ३) रेड हेड, ४) इन्का ऑरेंज, ५) इन्का यलो.
आंतरमशागत
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वाराम्ब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे. त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते. खते आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीन.

पीक संरक्षण (रोपवाटिका) सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बनडेझीम २० ग्रॅम किंवा कॅपटॉप २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात. पाणी हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी योग्य ते किटक्नाषक / बुरशीनाशक फवारावे. फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

27/05/2016

*आजचा शेती सल्ला: खरीप मूग/उडीद लागवड*

या पिकांसाठी मध्यम ते भारी, सपाट व निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत हे अल्प मुदतीचे पीक घेता येते परंतु उत्पादन कमी येते. जमीन नागंरून वखराच्या दोन –तीन पाळ्या देऊन भुसभुसीत करावी. पीएच ६.० ते ८.५ असलेल्या मध्यम ते भारी काळ्या जमिनीत ही पिके चागंली येतात. पाणथळ जमीन या पिकांच्या वाढीकरिता संवेनदशील अलल्यामुळे चागंला निचरा होणारी जमीन निवडावी ६५० ते ७०० मिलीमीटर पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्पादन चागंले येते. फुलो-यावर असतांना पाऊस अल्यास शेंगा कमी धरतात व उत्पादन कमी होते.
पेरणीची वेळः
पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत किंवा समानधारक पाऊस पडल्यास त्या अगोदर करावी. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. म्हणून पेरणी शक्यतो लवकर करवी.

सुधारित वाण –
मुग:वैभव, BMR १४५, उन्नती, उत्कर्षा विशेषता – रोगप्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण.
उडीद: TPU-४, TAU-०१
विशेषता – पक्वतेचा काळ २ ते २.५ महिने

बीज प्रकियाः
या पिकांवरील मुख्यतः मुळकूज हा रोग आढळून येतो. मुळकूज रोगामुळे झाडाची मुळे कुजतात व झाड वाळून जाते. पेरणीपूर्वी दर किलो बियाण्यास ३ ग्रॅम ‘थायरम’ बुरशी नाशक किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडमा बुरशी संवर्धन चोळल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

हेक्टरी बियाणे व लागवडीची पध्दतः
प्रति हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पाभारीने करावी. दोन ओळीकतील अंतर ३० से.मी. पर्यत वाढविल्यास हरकत नाही, मात्र बियाण्याचे प्रमाण १२ ते १५ किलो प्रति हेक्टर इतकेच ठेवावे.

सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापरः
१० ते १२ गाड्या प्रतिहेक्टर शेणखत व २० किलो नत्र तसेच ४० किलो स्फरद दिल्यास उत्पन्नात चागंली भर पडू शकते.

जिवाणू खताचा वापरः
पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणू खते लावल्यास उत्पाजनात अंदाजे १० ते १५ टक्के वाढ होते. रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धनाचे वापरद्वारे रासायनिक खताची ५० टक्के मात्रा कमी करता येते.

आंतर मशागतः
पेरणीपासून दोन ते तीन आठवड्यात एक खुरपणी व एक डवरणी करावी. प्रथम २५ ते ३० दिवस पिकात तण वाढू न दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. त्यानंतर पिकाचे जोमदार वाढीमुळे शेत झाकले की तण फारसे वाढत नाही. परतु शेतात तण पिकांचे वर वाढल्यास ते ४० ते ४५ दिवसाचे आत उपटुन काढावे.

सरासरी उत्पादन – मुग – १२ ते १५ क्विंटल उडीद – १० ते १२ क्विंटल

साठवण – साठवणीपुर्वी मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून कडुनिंबाची पाने मिसळुन पोत्यात किंवा टाकीत साठवावे.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

23/05/2016

आजचा शेती सल्ला: खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञान

खरीप ज्वारीची योग्य वेळी पेरणी केली,
तर चांगले उत्पादन मिळते. यासाठी संकरित व सुधारित वाणांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे.

लागवडीसाठी चांगला निचरा असलेली व ५.५ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत हे पीक घेता येते. चिकण पोयट्याची, मध्यम काळी जमीन खरीप ज्वारी लागवडीस योग्य आहे. जमिनीची चांगली नांगरट करून दोन ते तीन वेळा वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १० ते १२ गाड्या प्रति हेक्‍टरी शेणखत जमिनीत मिसळावे. नैर्ऋत्य मॉन्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वाफसा येताच पेरणी लवकर करावी. शक्‍यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी उरकावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो.

वाणाची निवड
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीतर्फे शिफारशीत वाण:

सुधारित वाण
१) सी.एस.व्ही. १५: ११० ते ११२ दिवसांत पक्व होतो. कोरडवाहू शेतीमध्ये धान्याचे सरासरी ३.५ ते ३.७ टन/ हेक्टर उत्पादन, तर कडब्याचे ११.५ ते १२.५ टन/ हेक्टर उत्पादन. या वाणाचे धांडे गोड असून, पाने जास्त काळ हिरवी राहतात. पानांवरील रोगांना प्रतिकारक तसेच खोडमाशी आणि खोडकिडीस प्रतिकारक्षम.
२) सी.एस.व्ही. १७: हा वाण बुटका आहे आणि अति लवकर पक्व होतो. अवर्षणग्रस्त क्षेत्रांसाठी अत्यंत उपयोगी. धान्याचे उत्पादन सरासरी २.२ ते २.५ टन/ हे. आणि कडब्याचे उत्पादन ६.५ ते ७ टन/ हे., खोडमाशी व खोडकिड्यास काही प्रमाणात प्रतिकारक्षम.
३) सी.एस.व्ही. २०: 1०९ दिवसांत तयार होतो. धान्याचे ३ ते ३.५ टन प्रति हेक्टरी उत्पादन. कडब्याचे 1३ ते १४ टन प्रति हेक्टरी उत्पादन. या वाणाचे दाणे मोत्यांसारखे पांढरे आहेत. हा वाण न लोळणारा आहे, त्यामुळे धान्याचे जास्त नुकसान होत नाही.
४) सी.एस.व्ही. २३: ११०ते११५ दिवसांमध्ये पक्व होतो. धान्याचे प्रति हेक्टचरी २.५ ते ३ टन व कडब्याचे १५ ते १६ टन उत्पादन मिळते. खोडमाशी आणि खोडकिड्यास प्रतिकारक्षम.
५) एस.पी.व्ही. ६६९: ११५-१२० दिवसांत तयार होतो. धान्याचे हे. ३.८ ते ४ टन उत्पादन आणि कडब्याचे १२ ते १२.५ टन उत्पादन.
६) पी.व्ही.के. ८०१: ११५ ते १२० दिवसांत तयार होतो. पावसात सापडल्यास इतर वाणांच्या तुलनेत या वाणाचे दाणे कमी काळे पडतात. प्रतिकूल परिस्थितीत हा वाण जमिनीवर लोळत नाही. हेक्टरी चार टन धान्याचे उत्पादन.
७) पी.व्ही.के. ८०९: अधिक धान्य आणि कडबा उत्पादन असा दुहेरी उपयुक्त वाण. हा वाण ११५ ते १२० दिवसांत तयार होतो. प्रति हेक्टरी ४ ते ४.५ टन धान्याचे उत्पादन.

संकरित वाण
१) सी.एस.एच. १४ हा वाण १०५ दिवसांत तयार होतो. मध्यम ते भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी शिफारस. दाणे मोत्यांसारखे पांढरे. दाण्यावरील बुरशीस प्रतिकारक्षम वाण. धान्याचे सरासरी उत्पादन ३.७ ते ४ टन/ हे. कडब्याचे ८.५ ते ९ टन उत्पादन.
२) सी.एस.एच. १६: ११० दिवसांमध्ये तयार होतो. धान्याचे उत्पादन ४ ते ४.५ टन/ हे. आणि कडब्याचे ९.५ ते १० टन/ हे., दाण्यांवरील बुरशी व पानांवरील रोगांस हा वाण प्रतिकारक्षम. कडब्याची उत्कृष्ट गुणवत्ता.
३) सी.एस.एच. २३: १०५ दिवसांत तयार होतो. दाण्यांवरील बुरशीस प्रतिकारक्षम. प्रति हेक्ट री धान्याचे ४ ते ४.२ टन आणि कडब्याचे ८.५ ते ९ टन उत्पादन.

रासायनिक खतांचा वापर
खरीप ज्वारीस माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. खरीप ज्वारीस दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर किंवा ऍझोस्पिरीलम हे जिवाणू खत चोळावे, त्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते. पेरणी तिफणीने/ दोन चाड्यांच्या पाभरीने करावी. दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपांतील १५ सें.मी. इतके ठेवावे. पेरणीस हेक्‍टरी दहा किलो बियाणे वापरावे. संकरित ज्वारीचे मोहोरबंद पिशवीतील प्रमाणित बियाणे वापरावे. पहिली विरळणी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २०-२२ दिवसांनी करावी. विरळणीनंतर १.८० ते २ लाख झाडांची संख्या ठेवावी.

आंतरपीक
पट्टा पद्धतीने तूर हे आंतरपीक३:१किंवा २:१ या प्रमाणात घ्यावे (दोन ओळी ज्वारीच्या व एक ओळ तुरीची किंवा दोन पाभरी ज्वारीच्या व एक पाभर तुरीची पेरावी), तसेच तुरीऐवजी मूग, उडीद व चवळी यासारखी आंतरपिकेदेखील घेता येतात.

पाणी व्यवस्थापन
पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२० त २५ दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस), फुलोऱ्यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) व दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या चार अवस्थांत जरुरीप्रमाणे शक्‍य झाल्यास पाणी द्यावे.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

19/05/2016

सोयबीन लागवड तंत्र ( भाग १२)
-इरफ़ान शेख

सोयाबीन एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाची मुलतत्वे –
१) शेताची नांगरट - उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अळ्या व कोषांचा नाश होतो. तसेच बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा नाश होतो.
२) फेरपालटीची पिके – खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर रब्बी अगर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे पीक घेऊ नये. कारण तसे केले असता किडी व रोगांच्या जीवनक्रमात खंड पडत नाही व पुढील पिकावर त्यांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने सोयाबिन-ऊस, सोयाबिन-गहू असा पिकांचा क्रम योग्य ठरतो.
३) आंतरपिके घेणे – सोयाबिन पिकांत मक्याचे आंतरपिक घेतले असता पांढरी माशी, इतर कीडी व रोगांचे प्रमाण कमी होते असे आढळून आले आहे. ऊस व कपाशीमध्ये सोयाबिनचे आंतरपीक फायदेशीर असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.
४) एकाच वेळी पेरणी करणे – सोयाबीनची एका शेतामध्ये तसेच आजूबाजूच्या शेतक-यांनी एकाच वेळी पेरणी करावी. म्हणजे किडी व रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते. उशिरा पेरलेल्या पिकांवर किडी व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर भागात उशिरा पेरलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
५) रोग – किडग्रस्त झाडे व किडी नष्ट करणे – शेतामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन रोग व किडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. तसेच किडींच्या अंडी, अळी या अवस्था अल्पप्रमाणात आढळून आल्यास त्या गोळा करून त्यांचा राँकेल अगर कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नाटनाट करावा. विशेषतः लष्करी अळी या किडीच्या अंड्यांचे पुंजके, बिहार सुरवंट या किडींच्या अळ्या यांचे या पध्दतीने नियंत्रण परिणामकारक ठरते.
६) खतांची योग्य मात्रा देणे – सोयाबिन पिकाला ते द्वीदलवर्गीय असल्याने नत्रखताची अल्प म्हणजे ३० किलो प्रती हेक्टर एवढीच आवश्यकता असते. अत्यंत सुपिक जमिनी असल्यास व भरपूर शेणखत वापरले असल्यास रासायनिक नत्र खत अत्यल्प लागते. नत्रखताची मात्रा जास्त झाल्यास पीक माजते व पाने खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
७) शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा ( Bird Perches) करणे – किडीच्या अळ्या, पिल्ले व पुर्ण वाढ झालेले किटक हे पक्ष्यांचे नैसर्गीक खाद्य असते. शेतात ठरावीक अंतरावर अंदाजे हेक्टरी १०० ठीकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी १०-१५ फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परीणामकारकरित्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.
८) प्रकाश सापळा वापरणे – रात्रीच्या वेळी शेतात २०० वँटचा दिवा लावून त्याखाली राँकेल मिश्रीत पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षिच होणारे कीटक मरतात. मेलेल्या किटकांमध्ये हानीकारक किटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादूर्भावाचे भाकीत करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.
९) कामगंध सापळा वापरणे – सोयाबिन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या कीडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकीत करण्यासाठी देखिल होतो.
१०) रोगमुक्त बियाण्याचा वापर – पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तमरीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरावे.
११) कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर – कीड व रोगप्रतीकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वात परिणामकारक उपाय आहे. परंतु अशा जास्त उत्पादन देणा-या आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यात.
१२) परोपजीवी कीटक ( Predators and Parasites ) - यामध्ये घातूक लशी (Viruses) परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू (Fungi and Bacteria) यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या कीडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातूक लस, लष्करी अळीवरील घातूक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बँसिलस थुरीजिएन्सीस व बॅव्हेरीआ बँसिआना या जिवाणुची किटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. सध्या त्यांची किंमत रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जास्त असली तरी त्यांचा वापर परीणामकारक ठरतो. रोग नियंत्रणासाठी देखिल ट्रायकोडर्मा विरीडी व स्युडोमोनास फ्लोरेसेन्स यांचा वापर असल्याचे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.
१३) पीक व्यवस्थापन पध्दतींचा सुयोग्य वापर – यामध्ये पिकासाठी लागणा-या अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा, जमिनीचा योग्य सामू (पी.एच. ६ ते ७) हेक्टरी झाडांची संख्या (४ ते ५ लाख प्रति हेक्टर) योग्यवेळी पाण्याची पाळी देणे, ओळीमधील व झाडांमधील योग्य अंतर, पेरणीची योग्य वेळ या सर्व बाबी किडी व रोगांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास सहाय्य होतात.
१४) रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा समतोल वापर - वरील सर्व गोष्टींचा अवलंब करून देखील किडी व रोगांना अनुकुल हवामान मिळाल्यास त्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रसायनांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पध्दतीने वापर करणे शहाणपणाचे ठरते. हानीकारक कीटकांची संख्या व त्यांचामुळे होणारी हानी यांचे प्रमाण ठरावीक पातळीपेक्षा जास्त झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे लागतात. निरनिराळ्या किडीसाठी संशोधन करून या पातळ्या निश्चित केल्या आहेत. उदा. खोडमाशीसाठी २६ टक्के खोड पोखरलेली लांबी एकूण झाडाच्या उंचीचा प्रमाणात असणे, उंट अळीसाठी एक मीटर लांबीच्या ओळीत १-२ पेक्षा जास्त अळ्या आढळणे इ. तांबेरा रोगासाठी पीक फुलावर असतांना बुरशीनाशकाची एक प्रतीबंधात्मक फवारणी करणे सांगली व कोल्हापूर भागात आवश्यक ठरते.

वरील सर्व बाबींचा विचार करून काटेकोरपणे रोग व किडींच्या नियंत्रणासाठी नियोजन करणे यालाच त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Management ) असे म्हणतात.(समाप्त).

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

18/05/2016

सोयबीन लागवड तंत्र ( भाग ११)
-इरफ़ान शेख

पीक कापणी व मळणी :

साधारणपणे सोयाबीनची सर्व पाने झडून जातात. तसेच ९५ टक्के शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणी योग्य झाले असे समजावे परंतू सोयाबीनच्या जास्त कालावधीच्या जातीमध्ये शेंगा जरी पक्व झालेल्या दिसल्या तरी झाडावर हिरवी पाने दिसून येतात. तसेच १० टक्के शेंगा सुध्दा हिरव्या दिसतात. तेव्हा पीक पक्व झाल्याबरोबर ताबडतोब कापणी सुरू करावी अन्यथा उशीर झाल्यास शेंगा तडकून जातात. व उत्पन्नात घट येवू शकते. सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करतांना सोयाबीनच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक आहे. जर बियाणामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशावेळी मळणी करतांना दाण्याची फूट होऊन दाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्याच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा –हास झालेला दिसून येतो. मळणीच्या वेळी बियामधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के पेक्षा जास्त असल्यास सुध्दा बियाण्यास हानी पोहचू शकते. तेव्हा सोयाबीनच्या कापणी व मळणीच्या वेळी सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. जेणे करून सोयाबीनची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्ता सुध्दा चांगली राहील.

सोयाबीनची कापणी व मळणी करण्याच्या पध्दती :

१) हाताने कापणी व मळणी :
सोयाबीनचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा सोयाबिन बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास हि पध्दत अधिक फायदेशिर ठरते अशा क्षेत्रातील पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला सोडुन देऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्या काडीने कींवा लाकडी दांड्याने ठोकून घ्याव्यात. या क्रियेत बियाला कमी मार लागल्यामूळे सोयाबिनचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुनवत्ता उदा. उगवणशक्ती टीकून ठेवायची झाल्यास हाताणे कापणी व मळणी करणे अत्यावश्यक आहे.

२) हाताने कापणी तथा मळणीयंत्राद्वारे मळणी :
हाताने कापणी केलेल्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असतांना मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते. परंतू मळणी यंत्राच्या ड्रमच्या फे-याची गती ४०० फेरे प्रति मिनीटपेक्षा जास्त असू नये.

३) कम्बाईनर द्वारे कापणी व मळणी :
पूर्वी कम्बाईनरव्दारे कापणी मळणी करणे फारसे प्रचलीत नव्हते परंतू आता काही भागात कम्बाईनरव्दारे कापणी व मळणी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. कापून ठेवलेल्या सोयाबिनची सुध्दा कम्बाईनरव्दारे मळणी करता येते. परंतू यात सोयाबीन दाळ होतांना दिसून येते. तसेच या सोयाबीनच्या बियाण्यांच्या कवचाला सुध्दा इजा पोहचुन त्याचा उगवनशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठीकाणी सोयाबीन हे बिजोत्पादणासाठी घ्यावयाचे असेल त्या ठीकाणी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करु नये. कम्बाईनरव्दारे कापणी मळणीकेल्यास ८-१० टक्के बियाण्याची घट येऊ शकते.

कापणी मळणी झल्यावर सोयाबीनचे बियाणे चांगले साफ करून व सुकवून मगच साठवावे. बियाणे सुकवितांना सोयाबीन मधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होवून बियाण्याच्या प्रतीवर परीणाम होतो त्यासाठी वाढ होवून बियाण्याच्या प्रतिवर परीणाम होतो, त्यासाठी साठवणू आधी बियाणे सुकविणे अत्यांवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सोयाबीन खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस सुकवून घेतात. रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.
बियाणे म्हणून सोयाबीन तयार कराचे झाल्यास १०-१२ टक्के ओलाव्याचे प्रमाण असलेले सोयाबिन हे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यातून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्या मध्ये साठवावे.(क्रमशः)...

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

14/05/2016

सोयबीन लागवड तंत्र ( भाग ७)
-इरफ़ान शेख

*सोयाबीन-सूर्यफूल अंतर पीक पद्धती एक वेगळा प्रयोग*

गरज:
* सोयाबीन हे मुख्य पीक
सोयाबीन वरील आळयांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय यामुळे फवारणीचा खर्च ही खूप वाढतोय.
* उंच वाढत असलेल्या सोयाबीन मध्ये अंतर मशागत करण्यास त्रास.
* फवारणी करताना साप दंशचे वाढते प्रमाण.
* अधिक उत्पादकता, उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्नांची गरज,ई. बाबींचा विचार करून सोयाबीन-सूर्यफूल अंतरपिक पद्धती प्रयोग करण्याची गरज भासली.

पद्धत: ४:२ किंवा ६:२ सोयाबीन-सूर्यफूल पेरणी.

निष्कर्ष:
*सोयाबीन पिकास अळ्यांचा प्रादुर्भाव कमी.
*शेंगा भरण्याची संख्या जास्त.
*अळ्यांचा प्रादुर्भाव सूर्यफूलवर अधिक अश्या प्रमाणे सूर्यफूल ट्रप क्रॉपचे काम करते
*सोयाबीनच्या उपलब्ध नत्र स्थिरीकरणामुळे सूर्यफूलचा आकार मोठा.
*फवारणी कमी लागली त्यामुळे उत्पादन खर्चात बचत.
*नियमित सोयाबीन उत्पादन तसेच वाढीव सूर्यफूल उत्पन्न.
*सीमान्त नफ्यात उल्लेखनीय वाढ
*रोख परतावा प्रमाण २.५२ %(कॅश रिटर्न रेशो) आहे त्यानुसार शास्त्रीय द्रष्ट्या पीक पद्धती योग्य.

घ्यावयाची काळजी:
-पेरणी ४:२ किंवा ६:२ हेच प्रमाण वापरावे,३:२ वापरू नये.
-पेरणी शक्यतो पूर्व-पश्चिम दिशेत केल्यास अधिक फायदा कारण लवकर वाढ होणार्‍या सूर्यफूलची सावली सोयाबीन वाढीवर परिणाम करत नाही.
-लागवड मध्यम ते भारी जमिनीवर केल्यास अधिक उत्तम.
-सोयाबीन खत मात्रे व्यतिरिक्त १० कि. एसएसपी व ५ कि. (क्रमशः)...

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

12/05/2016

सोयबीन लागवड तंत्र ( भाग ५)
-इरफ़ान शेख

*तण* *व्यवस्थापणः*

खरीप हंगामात बरेचदा सततच्या पावसामुळे सोयाबिन पिकात योग्य वेळी आंतर मशागतीची कामे करणे शक्य होत नाही. तसेच खरीप हंगामात तणांचा प्रादुर्भाव सुध्दा जास्त होत असतो आणि त्यामूळे ऊत्पादनात लक्षणीय घट (३० ते ८० टक्के) होऊ शकते म्हणून इतक्यामोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सतत चिंतीत आणि प्रयत्नशिल असतो कारण या हंगामात नाना प्रकारची आणि विविध कुटुंबातील तणे सोयबिनच्या पिकात आढळतात ती खालील प्रमाणे आहेत.

अ) रूंद पानाची तणे
१ गाजर गवत २ कोंबडा ३ चवळी ४ कुंजर भाजी ५ मोठी दुधी ६ छोटी दुधी ७ घोळ ८ हजारदाणी ९ शेवरा १० उंदिरकाणी ११ केना

ब) अरूंद पानाची तणे
१ हराळी २ कुंदा ३ चिमणचारा ४ शेपरूट ५ लोणागवत ६ लव्हाळा / नागरमोथा इत्यादि

सोयाबीन पिकाची मुख्यवाढीची अवस्था ही पेरणीपासुन १५ ते २० दिवस पर्यंत आहे. या कालावधिमध्ये तणाचा पुर्ण बंदोबस्त केला तर उत्पादनात लक्षणिय वाढ होते. म्हणुन तण नियंत्रण व्यवस्थापन ४५ दिवसाच्या आंत करणेच आवश्यक आहे. तण व्यवस्थापन खालील पध्दतीने करता येते.

अ) परंपरागत पध्दत
* दोन डवरणी व एक निंदणी ४५ दिवसाच्या आत करावी किंवा
* दोन निदणी, पेरणीनंतर ३० व्या दिवशी व ४५ व्या दिवशी करावी.
* तण नियंत्रण व जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी पेरणीनंतर ३० व्या दिवशी तणाचे आच्छादन करावे.

ब) रासायनिक पध्दत :

पॅडोमेथॅलीन प्रति हेक्टरी २.५ ते ३.३ लिटर/ हे. ६००-७०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या उगवणपूर्व रासायनिक तणनियंत्रकाचा वापर पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर पृष्ठभागावर येण्याआधी करावा.

* इमॅजीथायपर १० टक्के १०० ग्रॅम क्रियाशील घटक प्रती हेक्टरी.
* क्विझालोकाप इथाईल ( टरगा सुपर ५ टक्के इ. सी. ) व सोबत क्लोरीम्युँरान इथिल ( क्युरीन २५ टक्के ) हे तणनाशक ०.७५ लिटर सोबत स्टिकर ३० मि.ली. टाकून द्रावण चांगले हलवून प्रति हेक्टर वापरावे.या उगवणपश्चात तणनाशकामुळे अरूंद पाणाची तसेच रूंद पाणाची तणे याचा बंदोबस्त होतो. व निंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही.

एकात्मिक तण व्यवस्थापन :
उपलब्ध तण नियंत्रणाच्या पध्दतील मुलभूत तत्वाचा गरजेनूसार संयुक्तपने वापर करून निसर्गाचा समतोल कमी बिघडेल अशाप्रकारे तणनियंत्रणाचे उपाय योजने म्हणजेच एकात्मिक तण व्यवस्थापन करणे होय. दोन ओळीतील अंतर कमी करून पिकांची पेरणी जमिनीच्या मगदूरानूसार ३० सेमी. किंवा २२.५ सेमी. अंतरावर करून उगवणपूर्व तणनाशक फवारणी केल्यास परीणामकारक तणनियंत्रण करता येते. शिफरसीनुसार पेरणीपूर्वी आणि उगवणपूर्व तणनाशकांचे फवारणीनंतर २५-३० दिवसांनी एक डवरणी करून सोयाबीनचे परीणामकारक तणव्यवस्थापण करता येते. पूर्वमशागतीमध्ये खोल नांगरणी करून पेरणी करतांना शिफारसीनूसार तणनाशकांची फवारणी व पिकांच्या फेरपालट तंत्राचा अवलंब करून तणनियंत्रण करता येते.

तणनाशके फवारतांना / वापरताना घ्यावयाची काळजी :
१) तणनाशके त्य़ांचे शिफारसीत मात्रेनुसार वापरावी.
२) पाण्याचे प्रमाण ६०० ते ७०० लि. /हे.पेक्षा कमी नसावे.
३) फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
४) फवारणीपुर्वी जमीन भुसभुसीत करुन घ्यावी व जमीत ओलसरपणा असावा. फवारणी.व्यवस्थित व एकसारखी करावी.
५) एकाच प्रकारची तणनाशके वारंवार न वापरता फेरपालट करुन वापरावी.
६) पावर स्प्रे पंप वापरण्याचे टाळावे.
७) तणनाशकाचा फवारा शेजारी व इतर पिकावर उडणार नाही याची दक्षता घ्यावी
८) फवारणी नंतर ताबडतोब सिंचन करु नये.
९) फवारणी आधी माहीतीपत्र/ लेबल नीटवाचुन व समजुन घ्यावे.
१०) तणनाशकांचा संपर्क इतर किटकनाशके/बुरशीनाशके इत्यादि यांचेशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
११) तणनाशकासाटी वेगळा पंप राखुन ठेवावा.
(क्रमशः)...

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

10/05/2016

सोयबीन लागवड तंत्र ( भाग ३)
-इरफ़ान शेख

*सोयाबीन* *पिकात* *जीवाणु* *संवर्धकाचा* *वापर*:

एक एकर लागवडीकरिता दीड किलो रायझोबियम जिवाणू संवर्धक, दीड किलो पीएसबी आणि अर्धा किलो ट्रायकोडर्मा याप्रमाणे २५ किलो शेणखतात लागवडीपूर्वी साधारणतः आठ ते दहा दिवस आधी मिसळावे. अशाप्रकारे जैविक खत मिश्रित शेणखत सावलीच्या ठिकाणी ढीग करून ठेवावे. त्यावर हलके पाणी शिंपडून शेणखत मिश्रित जैविक खत ओलसर करून घ्यावे. शेणखत मिश्रित जैविक खताचा ढीग ओल्या गोणपाटाने झाकून घ्यावा. ढिगातील ओलसरपणा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने त्यावर पाणी शिंपडत राहावे. *हे* *करुण* *पहाच* *यावर्षी*.

अशाप्रकारे तयार केलेले शेणखत मिश्रित जैविक खत सरत्याने, तिफणीने, काकरीने अथवा ट्रॅक्‍टरने पेरणी करताना बियाण्यासोबतच द्यावे अथवा काकरीमध्ये जैविक खत मिश्रित शेणखत टाकून कोळपणी करावी किंवा संपूर्ण एक एकर क्षेत्रात जैविक खत मिश्रित शेणखत फेकून शेतात कोळपणी करावी. त्यामुळे जैविक खत मिश्रित शेणखत शेतातील मातीत मिसळले जाते. सदर प्रक्रिया पेरणीसोबत अथवा पेरणी झाल्याबरोबर लगेचच करावी.

लागवड करताना प्रति किलो बियाणास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धके आणि २५ ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सावलीत हलके वाळवुन लगेचच पेरणी पूर्ण करावी. योग्य उगवणीसाठी पेरणीची खोली फक्त ३ सें.मी. ठेवावी. सोयाबीनच्या बियाण्याची जास्त खोल पेरणी केल्यास बियाणे दडपली जाऊन उगवण कमी होते.
(क्रमशः)...

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

23/04/2016

आजचा शेती सल्ला: हळद लागवड तंत्रज्ञान भाग-१
रामेश्वर रामप्रताप चांडक, कृषी अधिकारी
अक्राणी जि.नंदुरबार

हवामानः- हळदीचे पिकास साधारणपणे उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या काळात ३० अंश सेंग्रे व समशितोष्ण हवामान मानवते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जास्त थंड हवामान असल्यास गड्डा चांगला पोसतो. परंतु ११ अंश सेंग्रे तापमान किंवा त्यापेक्षा कमी तापमानात पिकाची वाढ खुंटते. एप्रिल ते मे महिन्यातील ३० ते ३५ अंश सेंग्रे तापमान हळदीच्या उगवणीसाठी अनुकुल असेत तर पीकाच्या वाढीसाठी गरम व दमट हवामान अनुकुल असते. हळदीचे कंद भरण्यासाठी हिवाळी थंड हवा उपयुक्त ठरते. थंडीमुळे पिकाची होणारी कायीक वाढ किंवा पालेवाढ थांबते कंदाची वाढ सुरू होते. कोरडी व थंड हवा कंद पोसण्सास अनुकुल असते.
समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशात हळद चांगली येवू शकते. महाराष्ट्रात साधारणपणे सर्व भागात हळदीचे पिक चांगले येवू शकते. ज्या भागात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे किंवा ओलीताखालील क्षेत्र जास्त आहे त्या भागात हवेतील दमटपणा थोडा वाढतो व दमटपणा हळद पिकास अनुकूल असाच असतो. हळदीची लागवड जेथे फारशी केली जात नाही तेथे कंदमाशी सारख्या कीडींचा प्रादुर्भाव फारसा आढळत नाही.

जमीनः- पाणी साचून राहणा-या जमिनीत किंवा कमी निच-याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड व कमी निच-याच्या व कडक होणा-या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात. मध्यम काळी, भुसभुशीत, पीकाचे उत्तम पोषण होईल अशी कसदार गाळाची जमीन निवडावी. अशा जमिनीत हरळी, कुंदा, लव्हाळा यासारखी बहुवर्षिक तणे नसावीत.
रासायनिकदृष्ट्या विम्ल जमिनीत हळदीचे पीक येत नाही. मात्र जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ७ ते ८ असल्यास अशा जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. चुनखडीयुक्त जमिनीतही हळदीचे पीक वाढते परंतु पिकावर सतत पिवळसरपणा राहतो व सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत राहते. जास्त पावसाच्या भागातील तांबड्या जमिनी हळदीसाठी चांगल्या असतात. कारण त्या मऊ, भुसभुशीत व निच-याच्या असतात. अशा जमिनीत पाणी व खत व्यवस्थापन चांगले होणे आवश्यक असते. भारी काळ्या जमिनीची पाणीधारणशक्ती जास्त असून निचराशक्ती अगदीच कमी असते. त्यामुळे हळदीचे पीक त्यामध्ये चांगले येत नाही.

पीकाची फेरपालटः- एकाच जमिनीत हळदीचे पिकानंतर त्यावर हळद लागवड टाळावी. कारण हळदीचे पीकावर पडलेल्या रोगांची बीजे व कीडींचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे दुस-या वर्षी तेथील हळद पिकावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. म्हणून हळदीच्या पिकानंतर कांदा, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ऊस यासारखी पिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा या पिकानंतर हळद लागवड करू नये. कारण या पीकांवर येणारे सर्व जमिनीतून उद्भवणारे रोग हळद पिकावर येतात.

पूर्व मशागतः- पुर्वीचे पीक काढल्यानंतर हळदीच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची १८ ते २२ सेंमी खोल नांगरणी करानी. पहिली नांगरणी मार्चच्या मध्यात किंवा त्या अगोदर करावी व त्यानंतर १५ दिवसांनी जमीन चांगली तापल्यानंतर दुसरी नांगरणी पहिल्या नांगरणीच्या आडवी करावी व वखराच्या पाळ्या देवून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी एकरी २० ते ३० बैलगाडी किंवा १५ ते २० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट टाकावे. जमिनीत बारमाही तणे जसे हरळी, लव्हाळा इ. असल्यास ती वखरणीसोबतच वेचून घ्यावीत.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

21/04/2016
19/04/2016

आजचा शेती सल्ला: फुलशेती सल्ला

* गुलाब पुष्पांची पूर्ण काढणी झाली असल्यास झाडांना विश्रांती द्यावी. त्यानंतर हलकी ते मध्यम छाटणी करावी. जमिनीची मशागत करून वाफे बांधावेत. वाढीसाठी खतमात्रा देऊन पाणी द्यावे. गुलाबाची वाढ सुरू होऊन बहार येण्यास मदत होईल. छाटलेल्या भागावर १० टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
*निशिगंधात बियाणे काढून, सुकवून साठवून ठेवावे. निशीगंध लागवडीसाठी शेत मशागत करून तयार करावे. निशीगंधाची लागवड १५ एप्रिलनंतर करता येते.
* मोगरा फुले काढणी सुरू असेल. मोगरा फुले कळी अवस्थेत काढावीत. पूर्ण वाढलेल्या कळ्या उमलण्या पूर्वीच्या पक्व अवस्थेत देटासह काढाव्यात. कागदी पेट्यामध्ये पॅकिंग करून बाजारात पाठवावेत.
* शेवंतीच्या लागवडीसाठी शेत तयार करावे. जमिनीच्या उतारानुसार सरी-वरंबे तयार करून घ्यावेत. शेवंतीची लागवड करावी.
* हंगामी फुलझाडांची लागवड पूर्ण झाली असल्यास तीव्र उन्हापासून रोपे मरू नयेत म्हणून नियमाने व वेळेवर पाणी द्यावे. तणाचा वेळीच बंदोबस्त करावी.
* पॉलिहाउसमधील फुलेपिके - जास्त तापमानापासून हरितगृहातील पीक संरक्षणासाठी फॉगर्सचा उपयोग करावा. आच्छादनावर पांढऱ्या रंगाचा थर दिल्यास तापमान कमी होण्यास मदत होईल. तसेच पांढऱ्या रंगाच्या शेडिंग नेट असल्यास त्या पसरून घ्याव्यात.
* गुलाब झाडांना हलकी छाटणी करून घ्यावी. नवीन फुटींचे रोग व किडीपासून संरक्षण करावे. लाल कोळी किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
* कार्नेशनच्या फुलांची काढणी नियमित करावी. नवीन फुटींना व्यवस्थित वळण द्यावे.
* जरबेराचे रोग व किडीपासून संरक्षण करावे.

"शेकरु" इंस्टॉल करा आणि मिळवा शेतीसाठीच्या योजनांची, कार्यक्रमांची व सेवा हमी कायद्याची माहीती मोफत!!!
यासाठी हि लिंक वापरा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.solution.shekru
किंवा प्ले स्टोर वर shekru सर्च करा.
धन्यवाद.

Address

Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Locus Krushi Services Pvt. Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Locus Krushi Services Pvt. Ltd:

Share