kastakar.in

kastakar.in kastakar.in

India's First & only E-commerce Portal for your Complete Agricultural Needs.. Sagar D. Girase - Founder & Director.
2. Nikhilesh S. Swapnil A.

Management Team -
1. Gudadhe - M.D.
3. Shinde - CEO.
4. Rahul D. Patil - CEO. Activities - Kibbutz Tradelink has been established to introduce an agriculture sector in the business of E-commerce. Company Strategy

Purpose - To be a dawn in the online agriculture sector by providing enhanced services, relationship, and profitability. Visi

on - To provide quality services that exceeds the expectations of our esteemed customers and to improve the lifestyle and different ways of earning of agriculture sector. Core values - Kibbutz Tradelink is working to connect the agriculture sector to global online market. We integrate honesty, integrity and business ethics into all aspects of our business functioning. Goal - Over last two – three decades country has undergone a substantial structural and financial change, during which the number of farms and farmers has significantly decreased. The farmers in India today are not better equipped, not having entrepreneurial skills and managerial abilities required for coping up with the changing, dynamic world of modern agriculture. That’s why kibbutz trade link has been working particularly in above sectors to introduce the Indian agriculture sector to the global market and also working for exposure to modern farming.

15/07/2016
 # #आजचा शेती सल्ला: खरीप बटाटा लागवड तंत्र # #बटाटा हा आडसाली ऊसात उत्तम आंतरपिक ठरतोय. आमच्या जवळबन येथील शेतकर्याने ए...
25/06/2016

# #आजचा शेती सल्ला: खरीप बटाटा लागवड तंत्र # #

बटाटा हा आडसाली ऊसात उत्तम आंतरपिक ठरतोय. आमच्या जवळबन येथील शेतकर्याने एकरी ७० क्विंटल उत्पन्न आंतरपिकात तर सलग लागवड क्षेत्रात ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
आंतरपिक घेतल्यास उसाच्या पूर्ण खर्चाचे उत्पन्न बटाटा काढून देतो. यात बेणे निवड, त्याचा दर कमी करुण खरेदी करने आणि विक्री करताना किमान ८-९ रुपये प्रति किलो दर मिळवने हे जमल्यास हे पीक उत्तम नफा देतो.त्याच्या लागवड बाबत सविस्तर:
बटाट्याचे पीक मूळचे शीत हवामानातील आहे. थंड हवामान बटाटावाढीस पोषक आहे. या पिकासाठी खालीलप्रमाणे हवामान आवश्यक असते.
*तापमान- बटाटा लागवडीच्या वेळी २२ ते २५ अंश सेल्सिअस.पीकवाढीच्या सुरवातीच्या ४५ दिवसांच्या काळात २० ते २२ अंश सेल्सिअस. बटाटे (कंद) व त्याच्या वाढीच्या काळात (लागवडीपासून ४५ ते ६० दिवसांचा काळ) १७ ते २० अंश सेल्सिअस. बटाटेवाढीच्या काळात (६० ते ९० दिवस) २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
बटाटा पीकवाढीच्या कालावधीत तापमान जर ३६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास बटाटे पोसणे जवळजवळ बंद होते. उच्च तापमानामुळे बटाटा पिकामध्ये श्वासोच्छ्वास वाढतो आणि प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे पिष्टमय पदार्थ हे तयार झालेल्या बटाट्यातून घेतले जातात. झाडे पसरण्याऐवजी सरळ उंच वाढतात, पाने कोमेजतात, तसेच कंद निमुळते वाढतात आणि बटाटे तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
*आर्द्रता - बटाटा पीकवाढीच्या अवस्थेत ६५ ते ८० टक्के
*सूर्यप्रकाशाचे तास - १० तास प्रति दिवस
- बटाट्याच्या शाखीय वाढीच्या काळात दिवस मोठा व रात्र लहान असणे व बटाटे पोसण्याच्या काळात दिवस लहान व रात्र मोठी असणे आवश्यक आहे.
*
लागवड कालावधी - जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा.
*जमीन -
- चांगली निचऱ्याची, भुसभुशीत, कसदार व चांगले सेंद्रिय घटक असणारी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. रेतियुक्त पोयट्याची जमीन या पिकास फायदेशीर आहे. जर सामू ६.५ च्या खाली असेल तर जमिनीतील स्फुरद, मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये झाडांना कमी प्रमाणात उपलब्ध होतात. जास्त आम्लधर्मी, तसेच चोपण जमिनीत लागवड केल्यास पोटॅटो स्कॅब हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
*बटाटा लागवडीच्या पद्धती -
१) सपाट वाफे पद्धत - या पद्धतीत पूर्वमशागतीनंतर ६० सें. मी. अंतरावर हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्यांमध्ये लागणारी रासायनिक खते देऊन नंतर बटाटे बेणे २० सें. मी. अंतरावर मातीने झाकून घ्यावेत. सर्व बेणे झाकून झाल्यानंतर उलट्या वखराच्या साह्याने सपाटीकरण करावे. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य आकाराचे वाफे तयार करून हलके पाणी द्यावे.
२) सुधारित सरी - वरंबा पद्धत - या पद्धतीत मार्करच्या साह्याने ६० सें. मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी. त्या रेषेत २० सें. मी. अंतरावर बटाटे बेणे अंथरून घ्यावे. नंतर बैलाच्या रिझरने बटाटे बेणे वरंब्यात झाकून घ्यावे. लागवडीनंतर हलकेच पाणी द्यावे. ही पद्धत सोपी, कमी खर्चाची आहे.
३) रुंद गादी वाफा पद्धत - या सुधारित पद्धतीमध्ये तीन फूट रुंद वाफे तयार करून, त्यावर २ फूट अंतरावर बटाट्याची २ ओळींत लागवड केली जाते. प्रत्येक वाफ्यावर २ ओळींच्या मध्ये एक ठिबकची लॅटरल टाकली जाते. लागवडीनंतर पिकास ठिबक सिंचनाद्वारा पाणी, तसेच खते दिली जातात. या पद्धतीत बटाटा पिकाची वाढ जोमाने होते. रुंद गादी वाफा पद्धतीत ठिबक सिंचन पद्धतीबरोबरच तुषार सिंचन पद्धत ही फायदेशीर आहे.
४) यंत्राद्वारा बटाटा लागवड - केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र, लुधियाना यांनी विकसित केलेल्या ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने बटाटे लागवड करता येते. त्याद्वारा बटाटा बेणे लागवड ६० सें. मी. अंतरावर होऊन सरी- वरंबे तयार होतात. लागवड कमी वेळ, मजूर व खर्चामध्ये पूर्ण होते.
महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशित बटाटा वाण- कालावधी (दिवस)-उत्पादन (टन प्रति हेक्टरी)-वैशिष्ट्ये
कुफरी सूर्या-९० - १००-३०-३५-झाडे उंच जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकर्षक लांबोळे, पांढऱ्या रंगाचे, डोळे उथळ आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे, ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, उच्च तापमानाला अनुकूल आणि रोगप्रतिकारक.
कुफरी पुखराज-९०-१००-३५-४०-झाड मध्यम ते जोमदार वाढणारे, बटाटे लांबोळे, फिकट पांढऱ्या रंगाचे व पिठूळ, डोळे मध्यम खोल, अंकुर जांभळ्या रंगाचे, फुले पांढरी, खरीप आणि रब्बी, दोन्ही हंगामांत चांगले उत्पन्न मिळते. लवकर येणाऱ्या करप्यास प्रतिकारक व उशिराच्या करप्यास मध्यम प्रतिकारक.
चिपसोना - १-७५-९०-३०-३५-झाड मध्यम उंच जोमदार वाढणारे, बटाटे मध्यम ते मोठ्या आकाराचे, डोळे उथळ आणि अंकुर पांढरट हिरवे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्ससाठी उपयुक्त, उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना - २-७५-९०-३०-३५-बटाटे गोल अंडाकृती, मध्यम आकाराचे आणि पांढरे असतात. डोळे उथळ असतात, अंकुर फिकट लाल पिवळसर असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, धुक्यास प्रतिकारक आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना ३-७५-९०-३०-३५-झाडे जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकाराचे, पिवळसर रंगाचे आतून फिक्कट पांढरे, डोळे खोल आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक. साठवणुकीस उत्तम.
*बटाटा बियाणे निवड -
- बटाटा बेणे निरोगी, उत्तम दर्जाचे आणि भेसळमुक्त असावे.
- बेणे मध्यम आणि सारख्या आकाराचे असावे. मोठ्या आकाराच्या बेण्यामुळे बेण्यावरील खर्च वाढतो. लहान आकाराच्या बेण्यातून निघणारा कोंब कमकुवत राहून झाडांची वाढ योग्य होत नाही.
- लागवडीसाठी बेण्याचे वजन ३० ते ४० ग्रॅम असावे.
- बटाटा बेणे थंड हवामानात तयार झालेल्या बेण्यापासून अधिक उत्पादन मिळते.
- बटाटा बेणे पूर्ण पोसलेले, परिपक्व, चांगले मोड असलेले असावे. सामान्यपणे बेण्यावर एक सें. मी. आकाराचे जाड अंकुर असावेत. अंकुर अधिक लांब नसावेत. लागवडीवेळी मोडण्याची शक्यता असते.
- कोमेजलेले, तसेच सडलेले बटाटे काढून टाकावेत. बटाटा बेणे करपा आणि मर रोगांपासून मुक्त असावे.
- बेणे अपरिपक्व असल्यास उगवण नीट होत नाही, तर सुप्तावस्थेतील बेणे उशिरा उगवते. परिणामी, पीक तयार होण्याचा कालावधी वाढतो. बटाटा बेण्यावर डोळे नसल्यास ते वापरू नये.
*बीजप्रक्रिया -
- बटाटा बियाणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि इमिडाक्लोप्रिड (२०० एसएल) ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे बटाटा बियाणे बुडवून घ्यावे.
- लागवडीपूर्वी २.५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५०० मिलि द्रवरूप ॲसिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून २० क्विंटल बियाणे १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी

 # #आजचा शेती सल्ला: झेंडू लागवड तंत्र # #झेंडूची लागवड वर्षभरात तीनदा (खरीप, रब्बी व उन्हाळी) करता येत असल्याने वर्षभर ...
24/06/2016

# #आजचा शेती सल्ला: झेंडू लागवड तंत्र # #

झेंडूची लागवड वर्षभरात तीनदा (खरीप, रब्बी व उन्हाळी) करता येत असल्याने वर्षभर फुलांचे उत्पादन मिळू शकते. लागवडीआधी जमीन एकसारखी सपाट व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. खरीप हंगामात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी, तर उन्हाळी व रब्बी हंगामात उंच सपाट वाफ्यांत लागवड करावी.
लागवडीनंतर ३०-४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. पूर्ण लागवड करताना शक्‍यतो दुपारनंतर करावी. रोपांची लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. पूर्ण लागवडीनंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.
रोपवाटिका तयार करताना -
गादीवाफा तयार करावा. या गादीवाफ्याची रुंदी ६०-७६ सें.मी. व उंची १५ ते २० सें.मी. असावी. गादीवाफ्याची लांबी, लागवडीच्या क्षेत्रानुसार व उपलब्ध जागेनुसार असावी. साधारणतः एक एकर लागवडीसाठी तीन मी. लांब व ६० सें.मी. रुंदीचे सहा-आठ गादीवाफे लागतात.
गादीवाफ्यासाठी जमीन भुसभुशीत करावी. त्यात १५ ते २० किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत व २५ ग्रॅम डीएपी प्रति गादीवाफा टाकावे. गादीवाफ्यावर बियाणे टाकताना दोन ओळींत चार-पाच सें.मी. अंतर ठेवावे. बियाण्याची खोली दोन-तीन सें.मी. ठेवावी.
बियाणे पेरल्यानंतर गादीवाफ्यावर सुपीक माती व वाळू पसरावी. त्यानंतर गादीवाफा वाळलेल्या धानाच्या कडब्याने झाकून घ्यावा. बियाण्यांची उगवण होईपर्यंत गादीवाफ्यास झारीच्या साह्याने पाणी द्यावे. बियाणे पेरणीनंतर चार-पाच दिवसांनी उगवण दिसून येते.
झेंडूमध्ये अनेक प्रकार व जाती आहेत, यांतील महत्त्वाच्या जाती म्हणजे आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू, संकरित झेंडू. हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.
हंगामानुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची लागवड करावी. नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून घेता येते. यासाठी पट्टा पद्धतीने लागवड करावी. तसेच भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक आणि मुख्य पीक म्हणून झेंडू लागवड केली जाते.
आफ्रिकन झेंडू -
प्रमुख जाती - १) क्रॅकर जॅक, २) अलास्का, ३) ऑरेंज ट्रेझन्ट, ४) आफ्रिकन टॉल डबल मिक्‍स्ड
फ्रेंच झेंडू - महत्त्वाच्या जाती: १) स्प्रे, २) लेमन ड्रॉप्स, ३) फ्रेंच डबल मिक्‍स्ड
संकरित झेंडू -
जाती - १) पिटाईट, २) जिप्सी, ३) रेड हेड, ४) इन्का ऑरेंज, ५) इन्का यलो.
आंतरमशागत
लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यावेळी नत्र खताचा दुसरा हप्ता ५० किलो प्रति हेक्टर याप्रमाणात द्यावा. लागवड केलेला वरंबा फोडून दुसऱ्या वाराम्ब्यास माती लावावी व झाड मध्यभागी घ्यावे. त्याचवेळी रोपाचा शेंडा खुडावा म्हणजे झेंडूच्या रोपास भरपूर फांद्या फुटतात व उत्पादन चांगले येते. खते आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर याप्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश याप्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४०० किलो याप्रमाणे लागवडीपूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीन.
पीक संरक्षण (रोपवाटिका) सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणीनंतर एका आठवड्याने कार्बनडेझीम २० ग्रॅम किंवा कॅपटॉप २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतरप्रवाही कीटकनाशके व बुरशीनाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात. पाणी हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी योग्य ते किटक्नाषक / बुरशीनाशक फवारावे. फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.

आजचा शेती सल्ला: पेरणीची तयारी करायला लागावातावरण मॉन्सून सक्रीय होण्यास पूरक आहे.काल काही भागात दुपार नंतर चांगल्या सरी...
14/06/2016

आजचा शेती सल्ला: पेरणीची तयारी करायला लागा


वातावरण मॉन्सून सक्रीय होण्यास पूरक आहे.काल काही भागात दुपार नंतर चांगल्या सरी होत्या. आता लवकरच सर्वदूर पाऊस पडेल. मागच्या ३-४ वर्षां पासून मृगात सुद्धा उशिरा पेर होतोय. जितका उशिर जास्त तितकी उत्पादकता कमी,किड-रोगांची शक्यता जास्त, उत्पादन खर्च अधिक या बाबी क्रमाने येतात. यामुळे शेती उत्पन्नातील खर्च कमी करने अपरिहार्य झाले आहे. "प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार" या प्रमाणे तंत्रज्ञानाचे नियोजन करा. यातील काही बाबी:

* पाण्याची शाश्वत सोय असल्यास पेरणी करता येइल पण कोरडवाहु पेरणी ७० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्या नंतर करावी.
* फ़क्त शिफारषित ख़त मात्रेचा वापर करा, माती परिक्षणाचे अवलोकन करुण खत मात्रेत बदल करा. सर्वात कमी खर्च करुण योग्य पोषक घटक देणारी मिश्र खते निवडा. यात सोयाबीन साठीची कॉम्बिनेशन मी अगोदर दिलीत त्या प्रमाणे ईतर पिकांची बनवा.
* बियाणे खरेदी करताना जाहिरातिना न भूलता योग्य वानांची निवड करा. या पूर्वी बीजोत्पादन बद्दल संगीतल्या प्रमाणे शक्य त्या सर्व पिकात फ़क्त १०% क्षेत्रावर नविन बियाणे वापरा.
* घरचे बियाणे वापरताना बिज प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. बाजारात बरेच लिक्विड बिज प्रक्रिया साहित्य आले आहे त्याने ते करणे अधिक सोप्पे झाले आहे. बिज प्रक्रिया कराच.
* यांत्रिक पद्धतीने शक्य असल्यास जास्तीत जास्त पेरणी करा नसल्यास पारंपारिक पद्धतीन करताना मृतसरी पाडायचीच, मृदसंधारण,उताराला आडवी पेरणी या बाबी लक्षात असू दया.
* घेताय त्या सर्व पिकांची आधुनिक पण अल्प खर्चिक तंत्रज्ञान कृषि अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ यांच्या कडून हक्काने समजून घ्या. आमलात आणा.
* गळीतधान्य विकास कार्यक्रम, सघण कापूस लागवड, येत आहेत यात व ईतर खरीप योजनांमध्ये शेतकरी गटाना प्राधान्य आहे, त्या बाबत प्रयत्न करा.
* मोबाइल मेसेज बॉक्वर लक्ष ठेवा.
* उत्पादन खर्च कमी करण्याचा या पाडव्याचा संकल्प लक्षात असू दया. उत्पादन खर्च लिहून ठेवा.
* आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक तहसील कार्यालयात सक्रीय होताय त्यांचा उपयोग गरजेच्या वेळी करा.
* बियाणे किंवा ईतर निविष्ठानच्या तक्रारी करीता कृषि विकास अधिकारी यानच्याशि संपर्क करा.

 # # # # जून महिन्यात करावयाची शेतीची कामे  # # # #शेतकरी मित्रहो,मागील अंकात आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे या बा...
09/06/2016

# # # # जून महिन्यात करावयाची शेतीची कामे # # # #

शेतकरी मित्रहो,

मागील अंकात आपण मे महिन्यात करावयाची शेतीची कामे या बाबत माहिती घेतली होती. अशा करतो त्यानुसार आपण शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली असावीत. या वर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार पाऊस काळ खूप चांगला आहे म्हणून शेतकरी बंधूनी या खरीपाचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. सदरच्या लेखात आपण जून महिन्यात शेतीमध्ये कोण कोणती कामे करणे अपेक्षित आहे याची माहिती घेवू.

ऊस–
सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आडसाली ऊसाची लागण केली जाते. लागवड करण्यापूर्वी शेताची पूर्ण तयारी करून घ्यावी. शेणखत, कंपोस्ट किंवा प्रेसमड मातीत मिसळून सरीवरंबा पद्धतीने उसाची लागवड करावी. आडसाली उस लागवडीसाठी को. ८६०३२, को.एम. ०२६५, को.व्ही.एस.आय.९८०५ या जातींची निवड करावी. बियाण्यास बीजप्रक्रिया करून लागण कारावी १०० लिटर पाण्यात १०० ग्रम बाविस्टीन मिसळून बेणे बुडवून घ्यावे. आडसाली ऊसात मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, चवळी, घेवडा इ. द्वीदल पिके घ्यावीत. तसेच पालक, शेपू, मेथी, वांगी, मिरची, कांदा इ. भाजीपाला पिके घ्यावीत.

श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील

सोयाबीन–
सोयाबीन पेरणीसाठी सुधारित वाणांचा वापर करावा. लागवडी साठी जे एस ३३५, फुले कल्याणी किंवा फुले अग्रणी जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो व टोकणीसाठी ४५ किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी ४५ X १० सें.मी. अंतर ठेवावे. हेक्टरी ५० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद संपुर्ण पेरणीच्यावेळी द्यावे.बीजप्रक्रीया एक किलो बियाण्यास २.५ ग्रँम कार्बेन्डँझिम बीज प्रक्रीया करा. नंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रँम प्रमाणे रायझोबियम अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची बिजप्रक्रीया करा.

खरीप ज्वारी –
खरीप ज्वारी पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातीचाच वापर करावा..यामध्ये संकरीत वाण सी.एस.एच.,५, ९, १३, १४, १६,१७,१८, २३ तसेच सुधारीत वाण एस.पी.व्ही,४६२, ४७५ व ९४६, सी.एस.व्ही.१३,१५,१७,२० या जातींची निवड करावी. मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. बीजप्रक्रियेसाठी अँझोटोबँक्टर जीवाणू २५० ग्रँम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. पेरणीचेवेळी अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद व पालाश द्यावे.(नत्र, स्फुरद व पालाश – १००:५०:५० प्रती हेक्टर) पेरणीनंतर एक महिन्याने ५०किलो नत्राची मात्रा प्रतीहेक्टर द्या.

श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील

कापूस- बागायती कापूस-
लागवडी साठी सुधारित किंवा संकरीत वाणांची निवड करावी. शक्यतो BT बियाणे निवडावे. संकरीत कापसासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, आणि ५० किलो पालाश तर सुधारित वाणासाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, आणि ४० किलो पालाश द्यावे. २० % नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडी वेळी द्यावे. उरलेले नत्र ३० व ६० दिवसांनी विभागून द्यावे. पीक तण विरहित ठेवावे. पाऊस सुरू होई पर्यन्त गरजे प्रमाणे पाणी देत राहावे. रस सोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ई.सी. १० .मि. ली.किंवा इमिडाक्लोप्रिड ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.मित्र किडींचा वापर करावा. बोण्ड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापसातील सूर्यफूल,हरभरा, करडई,भुईमूग या सारख्या पिकांची रोपे उपटून टाकावी.

कोरडवाहु कापूस-
ओलावा टिकवण्यासाठी कापूस पिकाची लागवड /पेरणी उताराला आडवी समपातळीत करावी. पेरणीसाठी सुधारित किंवा संकरीत वाणाची निवड करावी.

बाजरी –
पावसाची सुरवात झाल्यानंतर व जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांचाच वापर करा. संकरीत वनामध्ये श्रध्दा (आर.एच.आर.बी.एच.८६०९), सबुरी (आर.एच.आर.बी.एच.८९२४, शांती, आदिशक्ती या वाणांची निवड करावी.सुधारीत वनांमध्ये – डब्ल्यू.सी.सी.७५, आय.सी.टी.पी.८२०३, धनशक्ती या वाणांची निवड करावी. ओलीताची सोय असेल अशा ठिकाणी शक्यतो संकरीत वाण पेरावे. अँझोटोबँक्टर जिवाणूची २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.शिफारशीप्रमाणे रासायनिक खाते द्यावीत.(४०:२०:२० नत्र-स्फुरद-पालाश किलो / हेक्टरी) बाजरीचे वाणानुसार हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे..पाणी देणे शक्य असल्यास फुटवे येणाच्या कालावधीत म्हणजे २० ते २५ दिवसांनी एक पाणी द्यावे.

श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील

भुईमूग –
भुईमुगाची पेरणी सदाहरण पाने १५ जून- १५ जुलै या वेळेत करावी. पेरणीसाठी सुधारीत आणि शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. (एस.बी.११, फुले प्रगती, टी.ए.जी.२४ व टी.जी.२६, जे. एल. ५०१ फुले भारती (जे.एल.७७६), फुले उन्नती, फुले व्यास, फुले उनप) पेरणीसाठी प्रकारानुसार हेक्टरी १०० ते १२० किलो बियाणे वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कार्बेन्डाझीम २ ग्रँम प्रती किलो बिजप्रक्रीया करावी. त्यानंतर बियाण्यावर रायझोबियम व स्फुरद जिवाणूची प्रक्रीया करावी. (२५० ग्रँम प्रत्येकी प्रती १०किलोस. रासायनिक खतामध्ये हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद किंवा १०० किलो डायअमोनियम फॉस्फेट संपुर्ण पेरणीच्या वेळी द्यावे + ४०० किलो जिप्सम (अर्धा पेरणीच्यावेळी व अर्धा आऱ्या सुटताना द्यावे)

तूर –
मान्सूनचा पाऊस झाल्यावर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. पेरणीसाठी बी.डी.एन.१,२,आय.सी.पी.एल.८७११९,आय.सी.पी.एल.८७,बी.एस.एम.आर.८५३, .के.टी.८८११, विपूला (टी-९२३०),एन-२९०-२१, फुले राजेश्वेरी, या वाणांची निवड करावी. आय.सी.पी.एल.८७ च्या पेरणीसाठी हेक्टरी १८ ते २० किलो बियाणे लागते व इतर जातींसाठी १२-१५ किलो लागते. बियाण्यास भुईमुगाप्रमाणेच बीजप्रक्रीया करावी. हेक्टरी १२५ किलो DAP पेरणीच्या वेळी द्यावे. बाजरी अधिक तूर, सूर्यफूल अधिक तूर आंतर पिक घेणे फायदेशीर आहे. (१:२ प्रमाण)
उडीद, मूग, कुळीथ, मटकी, चवळी, वाटाणा जमिनीत पुरेशी ओल आल्याबरोबर करावी.. पेरणीचेवेळी खताची मात्रा हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद द्यावे. तसेंच प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रँम कार्बेन्डाझीम व तदनंतर स्फुरद व रायझोबियम जीवाणू प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी. बियाण्याची मात्रा शिफारशीप्रमाणे वापरा.

श्री. अंकुश चोरमुले आणि श्री. विनायक शिंदे-पाटील

सुर्यफुल– पेरणीसाठी सुधारीत व शिफारस केलेल्या वाणांची निवड करून जमिनीत पुरेशी ओल असल्यावर पेरणी करावी. त्याकरीता सुधारित फुले भास्कर , मॉर्डेन, एस.एस.५६, भानू तसेच संकरीत जातीमध्ये फुले रविराज,के.बी.एस.एच.४४ या वाणाची निवड कारावी..पेरणीसाठी हेक्टरी ८ते १० किलो बियाणे वापरावे. पेरणीअंतर मध्यम जमिनीत ४५ X ३० सें.मी. व भारी जमिनीत ६० X ३० सें.मी. ठेवावे . पेरणीपुर्वी १ किलो बियाण्यास ५ ग्रँम मेटँलँक्झील (३५ टक्के अँप्रॉन) बिजप्रक्रीया करा. शेवटी प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रँम अँझोटोबँक्टर व २५ ग्रँम स्फुरद जिवाणूची प्रक्रीया करा.बागायती पिकासाठी पेरणीच्यावेळी हेक्टरी ३० किलो नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश व पेरणीनंतर एक महिन्याने ३० किलो नत्र द्यावे.

थोडक्यात पण महत्वाचे....
फळपिके –
फळपिकांची काढणी झाल्यानंतर पिकांचे अवशेष शेताच्या बाहेर काढावेत.. रोगग्रस्त, किडग्रस्त फांद्या कापून चाटून टाकाव्यात. जमिनीची नांगरट करावी त्यामुळे रोग व किडीच्या सुप्तवास्ता प्रखर सूर्यप्रकाशात येवून मारून जातात. नियंत्रणासाठी मदत होते.आंबा, चिक्कू, पेरू, डाळींब, नारळ तसेंच कोरडवाहू फळे यांची नवीन लागवड शिफारस केलेल्या अंतरावर पाऊस सूरू होताच करावी. भाजीपाला पिकांची लागवड करावयाची असल्यास जून च्या पहिल्या आठवड्यात रोपे तरी करावीत आणि जून च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाजाद करून घ्यावी.

वर दिलेल्या सर्व बाबींचा विचार करून खरिफ पिकांचे नियोजन करा. या वर्षी पाऊस चांगला असल्याने उत्पादन चांगले मिळू शकते. पुन्हा एकदा आपणा सर्वाना खरिफ हंगामासाठी आभाळभर शुभेच्छा...

04/06/2016
 #आजचा शेती सल्ला: खरीप मूग/उडीद लागवड #या पिकांसाठी मध्यम ते भारी, सपाट व निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत हे अ...
04/06/2016

#आजचा शेती सल्ला: खरीप मूग/उडीद लागवड #

या पिकांसाठी मध्यम ते भारी, सपाट व निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत हे अल्प मुदतीचे पीक घेता येते परंतु उत्पादन कमी येते. जमीन नागंरून वखराच्या दोन –तीन पाळ्या देऊन भुसभुसीत करावी. पीएच ६.० ते ८.५ असलेल्या मध्यम ते भारी काळ्या जमिनीत ही पिके चागंली येतात. पाणथळ जमीन या पिकांच्या वाढीकरिता संवेनदशील अलल्यामुळे चागंला निचरा होणारी जमीन निवडावी ६५० ते ७०० मिलीमीटर पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्पादन चागंले येते. फुलो-यावर असतांना पाऊस अल्यास शेंगा कमी धरतात व उत्पादन कमी होते.
पेरणीची वेळः
पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत किंवा समानधारक पाऊस पडल्यास त्या अगोदर करावी. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. म्हणून पेरणी शक्यतो लवकर करवी.
सुधारित वाण –
मुग:वैभव, BMR १४५, उन्नती, उत्कर्षा विशेषता – रोगप्रतिकारक व अधिक उत्पन्न देणारे वाण.
उडीद: TPU-४, TAU-०१
विशेषता – पक्वतेचा काळ २ ते २.५ महिने
बीज प्रकियाः
या पिकांवरील मुख्यतः मुळकूज हा रोग आढळून येतो. मुळकूज रोगामुळे झाडाची मुळे कुजतात व झाड वाळून जाते. पेरणीपूर्वी दर किलो बियाण्यास ३ ग्रॅम ‘थायरम’ बुरशी नाशक किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडमा बुरशी संवर्धन चोळल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
हेक्टरी बियाणे व लागवडीची पध्दतः
प्रति हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पाभारीने करावी. दोन ओळीकतील अंतर ३० से.मी. पर्यत वाढविल्यास हरकत नाही, मात्र बियाण्याचे प्रमाण १२ ते १५ किलो प्रति हेक्टर इतकेच ठेवावे.
सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापरः
१० ते १२ गाड्या प्रतिहेक्टर शेणखत व २० किलो नत्र तसेच ४० किलो स्फरद दिल्यास उत्पन्नात चागंली भर पडू शकते.
जिवाणू खताचा वापरः
पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणू खते लावल्यास उत्पाजनात अंदाजे १० ते १५ टक्के वाढ होते. रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धनाचे वापरद्वारे रासायनिक खताची ५० टक्के मात्रा कमी करता येते.
आंतर मशागतः
पेरणीपासून दोन ते तीन आठवड्यात एक खुरपणी व एक डवरणी करावी. प्रथम २५ ते ३० दिवस पिकात तण वाढू न दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. त्यानंतर पिकाचे जोमदार वाढीमुळे शेत झाकले की तण फारसे वाढत नाही. परतु शेतात तण पिकांचे वर वाढल्यास ते ४० ते ४५ दिवसाचे आत उपटुन काढावे.
सरासरी उत्पादन – मुग – १२ ते १५ क्विंटल उडीद – १० ते १२ क्विंटल
साठवण – साठवणीपुर्वी मुग व उडीद धान्य ४-५ दिवस चांगले उन्हात वाळवून कडुनिंबाची पाने मिसळुन पोत्यात किंवा टाकीत साठवावे.

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं..!!अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छो...
27/05/2016

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं..!!

अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.

इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.

प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.

सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.

nice initiative by IFFCO
25/05/2016

nice initiative by IFFCO

किसानों को बड़ी राहत देते हुए इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर कोआपरेटिव लिमिटेड (IFFCO) ने फर्टिलाइजर के दाम कम कर दिए हैं. देश की सबसे बड़ी उर्वरक सहकारिता संस्था ने डीएपी और एनपीके फर्टिलाइजर्स के दामों को घटा दिया है.

*खरीप बियाणे खरेदी करताना काळजी घ्या*खरीप हंगामाची सुरूवात येत्या काही दिवसात होत आहे. शेतीसाठी लागणा-या निविष्‍ठांची का...
24/05/2016

*खरीप बियाणे खरेदी करताना काळजी घ्या*

खरीप हंगामाची सुरूवात येत्या काही दिवसात होत आहे. शेतीसाठी लागणा-या निविष्‍ठांची काही दिवसातच जुळवाजुळव करावी लागणार आहे. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांमध्ये बियाणे हा प्रमुख घटक आहेे. खरीप हंगामासाठी साधारणत: बाजारात बियाण्‍याची उपलब्‍धता पाहून बियाणे खरेदी करावे लागणार आहे. बियाणे खरेदी करतांना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी आपण बियाणे खरेदी करतांना कोणकोणती काळजी घेतली पाहीजे ते आपण आता पाहू.
बियाण्‍याचे वाण निवडतांना:
खरीप हंगामात प्रामुख्‍याने बिटी कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद व ज्वारी ही पिके घेतली जातात. सर्व पिकांचे वाण निवडतांना ते वाण आपल्‍या वातावरणात येणारे, आपल्‍या जमिनीच्‍या मगदुरानुसार, किड व रोगास कमी बळी पडणारे व सर्वात महत्‍वाचे म्‍हणजे जास्‍तीत जास्‍त उत्‍पन्‍न देणारे असावे. याकरीता बिटी कपाशीचे जवळपास १०० च्या वर वाण बाजारात उपलब्‍ध आहेत त्‍यामुळे एकाच वाणाकडे न धावता इतर वाणांमधून वाण निवडावे. बिटी कपाशीचे BG II चे वाण निवडावे.
पिवशीवरील टॅग व लॉट नंबर:
प्रत्‍येक बियाण्‍याच्‍या पिशवीवरील टॅग आहे की नाही हे बघून घ्‍यावे. व टॅगवरील लॉट नंबर छापलेला आहे की अस्‍पष्‍ट आहे ते बघूनच ती पिशवी खरेदीसाठी निवडावी. या टॅगवर जो लॉट नंबर त्‍याची माहीती अशी आहे कि उदा. जर लॉट नंबर JAN २०१४– १३ – ०१- ०९ असेल तर याचा अर्थ असा होतो कि
यापैकी JAN २०१४ म्‍हणजे पिककाढणीचा महीना व वर्ष
१३- स्‍टेट कोड आहे (बियाणे ज्‍या राज्‍यात उत्‍पादित करण्‍यात आले आहे त्‍या राज्‍याचा सांकेतांक)
०१- हा प्‍लॉन्‍ट कोड आहे (बियाणे ज्‍या बिज केंद्रात प्रकिया केल्या गेले त्‍या बिज प्रकिया केंद्राचा सांकेतांक)
०९- हा ग्रोवर कोड आहे (बियाणे ज्या शेतक-याने उत्‍पादित केले आहे त्‍या शेतक-याचा सांकेतांक)
*बियाणे खरेदी करतांना मुख्‍यत्वे खालीलप्रमाणे काळजी घेतली पाहीजे:*
बियाणे खरेदी करतांना सर्वात महत्‍वाची बाब म्हणजे परवानाधारक विक्रेत्‍याकडूनच बियाणे खरेदी करावे.
त्‍यानंतर बियाण्‍याचा पिशवी ही सिलबंद असली पाहीजे, म्‍हणजे त्‍यामधून बियाणे बाहेर आलेले नसावे. कारण सिलबंद वेष्टनातील लेबल असलेले बियाणे हे कायद्याच्या मापदंडानुसार तयार करण्यात येते, त्यामुळे बियाण्याची गुणवत्ता उत्तम असते.
बियाण्‍याचे पिशवीवर लेबल असले पाहीजे. त्या लेबलवरची छपाई स्‍पष्‍ट असावी व त्यावर बीज प्रमाणीकरणाचे न्यूनतम मानके मापदंडानुसार आहेत कि नाही हे तपासून घ्यावे.
मापदंडानुसार उत्तम उगवणशक्‍ती असलेले, चांगल्‍या प्रतिचे सुधारीत, किड व रोगापासून मुक्‍त असलेले बियाणे निवडावे.
बियाणे खरेदी करतांना वैध मुदतीची खात्री करून घ्‍यावी व वैध मुदतीच्‍या आतील बियाणेच खरेदी करावे.
पिशवीवर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्‍त दराने बियाणे खरेदी करू नये.
बियाणे खरेदी करतांना विक्रेत्याकडून संपूर्ण विवरणासह बिल अवश्य घ्यावे. संपूर्ण तपशील जसे की पिक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, वजन, बियाणे ज्‍या कंपनीचे आहे त्‍या कंपनीचे नाव, बियाण्याची किंमत, खरेदी दाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्‍याचे नाव व सही इत्‍यादी नमूद असलेली रोखी अथवा उधारीची पावती घ्‍यावी.
बियाणे खरेदीची पावती, वेष्‍टन (बॅग) पिशवी व त्‍यावरील लेबल (टॅग) इत्‍यादी जपून ठेवावे.
बियाण्यांची हाताळणी:
खरेदी केलेले बियाणे बिलाप्रमाणे व सिलबंद असल्‍याची खात्री करून घ्‍यावी
पेरणीसाठी खरेदी केलेल्‍या बियाण्‍याची पेरणीपर्यंत योग्‍य जागी साठवण करावी.
ओलसर जागी किंवा खतांजवळ बियाण्‍याची साठवण करू नये.
सोयाबीन सारख्‍या बियाण्‍यांचा बॅगा एकावर एक जास्‍त रचून ठेवू नये. कारण सोयाबीनचे कवच हे फार नाजूक असते.
बियाणे खरेदी करतांना संबधीत विक्रेता जर संपूर्ण विवरणासह बिल देत नसेल, मुदतबाह्य बियाण्‍याची विक्री करत असेल आणि छापिल किंमतीपेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करत असेल तर यासंबधीची तक्रार जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकरी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी किंवा संबधीत बियाणे कंपनीच्‍या जिल्‍हा कार्यालयात लेखी स्‍वरूपात तात्‍काळ करावी.

सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरणएक शेतकरी ऑरगॅनिक मंड्या या दुकानात प्रवेश कर...
22/05/2016

सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण
एक शेतकरी ऑरगॅनिक मंड्या या दुकानात प्रवेश करतो आणि टोमॅटो आणि मिरच्या असलेली एक मोठी पिशवी तेथील टेबलावर ठेवतो. रोखपाल या सामानाचे वजन करतो. टॉमेटोचे वजन असते ४.५ किलो तर मिरच्या असतात १.२५ किलोच्या.... वजन झाल्यावर रोखपाल शेतकऱ्याला काही कोऱ्या नोटो देतो आणि शेतकरी हे पैसे खिशात ठेवून निघून जातो आणि ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते सहा मिनिटापेक्षाही कमी वेळात..... ना कुठला विलंब, ना वाटाघाटी, ना मध्यस्थ, ना निराशा...
पण अवघ्या वर्षभरापूर्वी मंड्या येथील परिस्थिती अशी मुळीच नव्हती. २०१५ च्या जुलै महिन्यात तेथील वीसहून जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. सतत ओलिताखाली असलेला आणि हिरवागार असा हा मंड्या जिल्हा बंगळुरुपासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर आहे... पण येथील शेतकरी मात्र सातत्याने कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. एका अहवालानुसार मंड्या येथील शेतकऱ्यांकडे बँकांचे गेल्या वर्षभरात (२०१४-१५) घेतलेले सुमारे बाराशे कोटी रुपयांचे देणे थकले आहे. सरकारी अनास्था, शेतमालाच्या घसरत्या किंमती, अतिरिक्त उत्पादन, शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनाचा अभाव, यांसारख्या अनेक बाबी या चिंताजनक परिस्थितीसाठी कारणीभूत आहेत.
पण या सर्व परिस्थितीने सदतीस वर्षीय मधुचंदन चिक्कादेविया मात्र चांगलेच अस्वस्थ झाले. स्वतः एक आयटी व्यावसायिक असलेले मधु हे खरं म्हणजे त्यावेळी कॅलिफोर्नियामध्ये आपले स्वप्नवत आयुष्य जगत होते. मधू यांचा जन्म मंड्याचा... एका शेतकरी कुंटुंबातील.... तर बंगळुरु कृषी विद्यापीठाच्या प्रशस्त अशा तीनशे एकरच्या परिसरात त्यांचे संपूर्ण बालपण गेले, त्या ठिकाणी त्यांचे वडील हे कुलगुरु म्हणून निवृत्त झाले होते. मधु हे पुढे जाऊन एक सॉफ्टवेअर अभियंता बनले आणि त्यांनी जगभरात काम केले. तसेच कंपन्यांना ऑटोमेटेड सॉफ्टवेअर टेस्टींग सोल्युशन्स पुरविणाऱ्या वेरिफाया कॉर्पोरेशनचे ते सहसंस्थापकही होते. असे असले तरी मनातून मात्र ते नेहमीच एक शेतकरी होते आणि हा शेतकरी काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता...
अखेर ऑगस्ट, २०१४ मध्ये त्यांनी सर्व काही सोडले आणि ते मंड्याला परत आले. शेतकऱ्यांची भरभराट करण्यासाठी मदत करणे, हेच आता त्यांचे ध्येय होते. ते सांगतात, “ संपूर्ण जगात शेतकरी ही एकच अशी व्यक्ती असते जी होलसेल भावात विक्री करते पण खरेदी मात्र रीटेल किंमतीत करते.” आणि पुढे म्हणतात, “ शेतकरी त्यांच्या जमिनी सोडून, हलक्यासलक्या कामांच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यातच या कामांमध्ये कोणतेही स्थैर्य नसल्यामुळे त्यांना सतत जबरदस्तीने एका कामावरुन दुसऱ्या कामाकडे उड्या माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांना अखंडीत आर्थिक लाभही नाकारला जातो. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणेही त्यांच्यासाठी अशक्य बनते आणि अंतिमतः ते कर्जाच्या ओझ्याखाली अडकतात आणि शेवटी आत्महत्या करण्याचीच वेळ त्यांच्यावर येते. हे एक दुष्टचक्र आहे, पण असे एक दुष्टचक्र जे थांबवता येऊ शकते. ऑरगॅनिक मंड्याची स्थापनाच मुळी हे ध्येय साध्य करण्यासाठी झाली आहे – शेतकऱ्यांना संपन्न, आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी, जेणेकरुन कोणीही हा व्यवसाय सोडून जाणार नाही.
ऑरगॅनिक मंड्याची बीजेः
जेंव्हा मधू मंड्या येथे परतले, तेंव्हा जी पहिली गोष्ट त्यांना जाणवली ती म्हणजे, विखुरलेली जमीन.... असे अनेक शेतकरी होते, जे सेंद्रीय पद्धतीकडे वळले होते आणि देशी तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. तरी काही मोठ्या समस्या होत्याच – संघटीत बाजारपेठ आणि माहिती विनिमयाचा अभाव...
याविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तींना (मित्र आणि माजी सहकारी) एकत्र आणणे, हे मधू यांनी टाकलेले पहिले पाऊल होते. या मंडळींच्या मदतीने एक कोटी रुपये उभारण्यात आले आणि त्यांनी मंड्या ऑरगॅनिक फार्मर्स कॉऑपरेटीव्ह सोसायटीची रितसर नोंदणी केली आणि पहिल्याच टप्प्यात २४० सेंद्रीय शेतकऱ्यांना एकत्र आणले. सगळे सरकारी सोपस्कार पूर्ण करण्यासाठी आणि ऑरगॅनिक मंड्या हा ब्रॅन्ड – ज्या अंतर्गत शेतकरी त्यांची उत्पादने विकतील – स्थापित करण्यासाठी त्यांना आठ महिने लागले.
“ आम्ही अनेक कल्पनांवर विचार केला – बंगळुरुमध्ये सेंद्रीय दुकानांची एक साखळी सुरु करणे किंवा एक ई-कॉमर्स वेबसाईट सुरु करणे, रेस्टॉरंटस् बरोबर भागीदारी करणे आणि उत्पादनांची विक्री करणे. पण यापैकी कशातूनच शेतकऱ्यांना ग्राहकांबरोबर थेट संवाद साधता येऊ शकला नसता आणि माझ्यासाठी तर तेच प्राधान्य होते. जोपर्यंत शेतकऱ्याने केलेल्या कष्टाचे मोल ग्राहकाला जाणवत नाही किंवा ग्राहकाचे प्राधान्यक्रम शेतकऱ्याला समजत नाहीत, तोपर्यंत शेती कधीच प्रचलित होऊ शकत नाही,” ते सांगतात.
मधू यांनी बंगळुरु आणि मैसुरू यांना जोडणाऱ्या मंड्या महामार्गाचा उपयोग करुन घेण्याचा निर्णय घेतला. आपली उत्पादने विकत घेण्यासाठी प्रवासी येथे नक्कीच थांबतील, असा त्यांना विश्वास होता. त्यापुढे जाऊन लोकांचा उत्साह आणखी वाढविण्यासाठी म्हणून त्यांनी दुकानाच्या बाजूलाच एक सेंद्रीय रेस्टॉरंट सुरु केले. “ प्रवासी खाण्यासाठी म्हणून येथे थांबतील आणि शेवटी या दुकानातूनच आठवड्याचे सामान खरेदी करतील, असा या योजनेमागचा माझा विचार होता. पण साधारण महिन्याभरानंतर हा ट्रेंड उलटाच झाला. लोक पहिल्यांदा आमच्या दुकानात थांबू लागले आणि यातून आम्हाला निश्चितच खूप समाधान मिळाले,” ते सांगतात.
योग्य पद्धतींचा अंतर्भावः
ऑरगॅनिक मंड्याची सर्वात चांगली गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे शेतकरी आणि ग्राहकांना एकमेकांना जोडण्याची मधू यांची कल्पना... त्यांच्या मते, “ एकीकडे किंमतीचा विचार करता, सेंद्रीय उत्पादनांकडे वळताना, ग्राहकांची थोडी दुविधा असते आणि दुसरीकडे अतिरिक्त रसायनांचा शरीराशी संपर्क आल्याने एका चोवीस वर्षीय शेतकऱ्याचा कर्करोगाने मृत्यू होतो. त्यामुळे सेंद्रीय उत्पादनांविषयी लोकांमध्ये जागरुती आणणे हे अत्यावश्यक असून, एका सामाईक माध्यमाची निर्मिती केल्याशिवाय हे शक्य होणार नाही.”
त्यातूनच कंपनीच्या ‘ऑरगॅनिक टुरिझम’ या उपक्रमाचा जन्म झाला, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे –
१. स्वेट डोनेशन कॅम्पेन – हा अशा प्रकारचा पहिलाच स्वयंसेवी उपक्रम असून, यामध्ये पैशाच्या नाही तर घामाच्या स्वरुपात योगदान मागण्यात येते. मधू सांगतात, “ वेळेवर कामगार न मिळाल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नापैकी वीस टक्के उत्पन्न गमवावे लागते. या उपक्रमांतर्गत, ज्या लोकांना शेतीची कामे करायला आवडतात किंवा हा अनुभव घेण्याची इच्छा असते, ते आठवड्याच्या शेवटी येथे येऊ शकतात आणि ऑरगॅनिक मंड्याच्या शेतांमध्ये दिवसभर काम करु शकतात. यासंदर्भातील एक उदाहरण देताना मधू सांगतात, “ साठीच्या घरातील एका शेतकऱ्याला दिवसभराच्या मजुरीवर तीन हजार रुपये खर्च करणे शक्य नव्हते, पण त्याच्या संपूर्ण शेतात प्रतिरोपण करणेही गरजेचे होते. आम्ही आमच्या फेसबुक पेजवर ही विनंती नोंदवली आणि आम्हाला २४ असे स्वयंसेवक मिळाले, ज्यांनी अर्ध्या दिवसातच हे काम पूर्ण केले.” गेल्या काही महिन्यात स्वेट डोनेशन कॅम्पेनला बंगळुरुमधून एक हजाराहून जास्त स्वयंसेवक मिळाले आहेत – ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते आयटी व्यावसायिक ते निवृत्त जोडप्यांपर्यंतचा समावेश आहे.
२. फार्म शेअर – हा आणखी एक आगळावेगळा उपक्रम असून, यामध्ये लोकांना अर्ध्या एकरापासून ते दोन एकरापर्यंतचे शेत तीन महिन्यांसाठी साधारणपणे ३५,००० रुपये भाड्याने घेता येते आणि ते स्वतःचे पीक लावू शकतात. यामध्ये या कुटुंबांना तीन महिन्यांच्या काळात आठ ते नऊ रात्री शेतात रहाण्याची परवानगी मिळते आणि शेती करण्याचीही.. त्यांच्या गैरहजेरीत ऑरगॅनिक मंड्याचे शेतकरी संपूर्ण जमिनीची काळजी घेतात. एकदा का पीक तयार झाले की ते ऑरगॅनिक मंड्यांना विकायचे की स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी ठेवायचे, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या कुटुंबांना असते. यामुळे शेतकऱ्यांना सतत उत्पन्न मिळत रहाते आणि शहरातील नागरिकांची सेंद्रीय शेतीशी ओळख होते आणि ते याचा आनंदही घेऊ शकतात.
३. टीम@फार्म – या उपक्रमांतर्गत, कंपन्यांना त्यांच्या कामगारांना शेतीच्या कामांसाठी दिवसभर घेऊन येण्यासाठी, ग्रामीण खेळ जसे की कबड्डी, गिल्ली दंडा आणि लगोरी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचबरोबर लोकांना संपूर्ण प्रक्रिया समजू शकेल या दृष्टीने सहली काढण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि या सगळ्यासाठी प्रति दिवस तेराशे रुपये, एवढा वाजवी दर आकाराला जातो.
यशाच्या मार्गावरः
ऑरगॅनिक मंड्या पूर्णपणे कार्यरत होऊन फक्त सुमारे सहा महिने झाले आहेत आणि आताच ते यशाच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे आताच पाचशेहून अधिक नोंदणीकृत शेतकरी असून, त्यांच्या एकत्रित मालकीची जमीन सुमारे २०० एकर एवढी आहे आणि ते विक्रीसाठी सत्तरहून अधिक विविध प्रकारच्या मालाचे उत्पादन करत आहेत – तांदूळ, डाळी आणि कढधान्ये, खाद्यतेल, वैयक्तिक आरोग्य उत्पादने, पेये, मसाले, इत्यादी.. उत्पन्नाचा विचार करता, अवघ्या चार महिन्यांतच कंपनीचे उत्पन्न एक कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. तर दर महा बास्केटच्या किंमती या ९९९ रुपये, १४९९ रुपये आणि १९९९ रुपयांवर असून, त्यांना चांगली मागणी आहे. “ शेवटी आरोग्यदायी उत्पादने कोणाला नको आहेत आणि ती देखील अशी जी ऑनलाईन मागविता येतील आणि तुम्हाला घरपोच मिळतील,” मधू सांगतात.
पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, मधू यांना रिव्हर्स मायग्रेशन होताना दिसत आहे, अर्थात लोक पुन्हा एकदा शहरांमधून आपापल्या शेतांकडे परत येत आहेत. “ जेंव्हा कोणी शहरांमधून परत येऊन, पुन्हा शेतीला सुरुवात करतो, ते माझे सर्वात मोठे यश असते आणि आतापर्यंत सुमारे ५७ जण आपल्या शेताकडे परत आले आहेत. ग्रामीण, सेंद्रीय क्रांतीची ही तर फक्त सुरुवात आहे,” मधू सांगतात.
शाश्वत भविष्याचा मार्गः
कुठल्याही व्यवसायाच्या भरभराटीसाठी टिकाव धरुन रहाणे खूपच महत्वाचे असते, याची मधू यांना चांगलीच जाणीव आहे. पण याचा फायदा ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे. पुढील वर्षभरात, उत्पन्न वाढीसाठी दहा हजार कुटुंबांना जोडण्याचे काम ते करणार असून, त्यांना दरमहा सरासरी दोन ते तीन हजार रुपयांचा माल विकून त्यातून साधारणपणे ३० कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याची त्यांची योजना आहे.
“या मागची कल्पना अशी आहे की, या कुटुंबांची आमचे सदस्य म्हणून नोंदणी करुन घ्यायची, ज्यासाठी वार्षिक खर्च एक हजार रुपये असेल. याचा दुहेरी फायदा होईल – एक म्हणजे त्यांना संपूर्ण वर्षासाठी आमच्या सर्व उत्पादनांवर मोठी सवलत मिळेल आणि दुसरे, आम्ही त्यांची ओळख आरोग्यदायी खाद्य पद्धतींशी करुन देऊ,” ते सांगतात.
२०२० पर्यंत संपूर्ण मंड्या जिल्हा सेंद्रीय करण्याचे मधू यांचे स्वप्न आहे.
लेखक – श्वेता विट्टा

Address

C/o Neelay Industries, Plot No. C-11, Gala No. 36, MIDC, Satpur
Nashik
422007

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919168609545

Alerts

Be the first to know and let us send you an email when kastakar.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to kastakar.in:

Share