11/02/2018
विमा म्हणजे काय ?
विमा संपत्तीच्या आर्थिक मुल्यांच्या रक्षणाचे काम करतो
समजा तुम्ही नविन कार घेतली त्या कारचा आपण लगेच विमा करतो, कारण एखाद्या दुर्घटनेमध्ये कार नष्ट झाली तरी त्याची भरपाई मिळते थोडक्यात कारचे आर्थिक मुल्य विमा काढल्यामुळे सुरक्षित रहाते.
त्यामुळे 'सुजाण' नागरीक नविन घेतलेल्या कारचा विमा करायला नकार देत नाही.
प्रत्येक माणुस त्याच्या आयुष्यात संपत्तिची निर्मिती करत असतो. त्यामुळे मानवी आयुष्य ही सुद्धा एक संपत्ती आहे.
प्रत्येक व्यक्ति मिळालेल्या संपत्तीतुन त्याच्या कुटुंबाच्या गरजा पुर्ण करत असतो, नवनवीन उद्दिष्ट पुर्ण करत असतो.
प्रत्येक माणसाचा मृत्यु दिंनाक अगोदरच माहीती असता तर सर्व आर्थिक उलाढालींची तजवीज त्याने अगोदरच करुन ठेवली असती, नवीन आर्थिक जबाबदार्या घेतल्या नसत्या आणि प्रियजनांसाठी अगोदरच तजवीज करुन ठेवली असती.
परंतु माणुस जातो अचानकच आणि मागे अर्धवट जबाबदार्या आणि आर्थिक संकटे प्रियजनांसाठी सोडुन जातो.
पण अशा संकटात सापडलेल्या 'प्रत्येक' कुटुंबाला त्यांचे उत्पन्न , मुलांचे शिक्षण व लग्न, जीवन साथीदाराचे भावी आयुष्य, कर्ज परतफेड , चांगले रहाणीमान, समाजातील त्यांचे स्थान याची जबाबदारी कोणी सुजाण नागरीक (ज्याच्या मते विमा गरजेचा नाही ) घेत असेल तर विमा आवश्यक नाही.
विमा हा एका गरीब कुटुंबा पासून तर अब्जाधीश कुटुंबा पर्यत सर्वाना महत्वाचा व गरजेचा आहे.
विमा कीती असावा ?
विमा हा मानवी शरीराचा नसुन त्या व्यक्तीच्या बुद्धीचा, त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा, त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा, त्याच्या आर्थिक जबाबदार्र्यांचा , त्यांने कमवलेल्या संपत्तीचा करत असतो.
त्यामुळे ज्याचे उत्पन्न जेवढे जास्त, जबाबदार्र्या जेवढ्या जास्त, संपत्ती जेवढी जास्त त्याला तेवढ्या अधिक विमासंरक्षणाची गरज असते. (insurance as per income earning capacity).
आपल्या जीवनाचा सच्चा साथीदार !