Ajay surpe

Ajay surpe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ajay surpe, Collection agency, osmanabad, Murum.

29/10/2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, केशेगाव चे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी आदरणीय श्री.अरविंदजी गोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई तुळजाभवानी, संत गोरोबाकाका त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना !

21/10/2024

तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार !

तुळजापूर विधानसभेसाठी भाजपाकडून पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जनसेवेच्या संधीबद्दल धन्यवाद..

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सोलापूर-तुळजापुर-धाराशिव रेल्वेमार्ग मागील ५ वर्षात आपण सर्वांनी मिळून मोठ्या ताकदीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अनेक अडचणींवर आजवर मोठ्या हिंमतीने मात करीत आपल्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मागील ५ वर्षात जी विकासकामे केली, त्याची पावती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबद्दल पक्षाच्या सर्व मान्यवर नेते मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मिळून खूप ताकदीने अनेक कामे पुढे नेली आहेत. वेगवेगळ्या संकटांवर मात केली आहे. पुढील काळात आणखी ताकदीने मिळून काम करायचे आहे.

मागील कार्यकाळात ज्या गोष्टी आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करण्याचा शब्द दिला होता, जवळपास त्या सर्व बाबी महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षात पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील २४ महिन्यांत मतदारसंघात २०० पेक्षा अधिक रस्ते मंजूर केले. अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला लाभली, हे आपले भाग्य आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटक तुळजापूरला यावा, मुक्कामी रहावा यातून हजारोंच्या हाताला काम मिळावे, यासाठी आपले नियोजन सुरू आहे. त्यासाठीच २,००० कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने त्याला तत्वतः मान्यताही दिली आहे. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा रोजगार निर्माण होईल त्यासाठीच आपला अट्टाहास आहे.

पुढील काळात आपल्या भागासाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्प खेचून आणायचे आहेत. कृष्णा खोर्‍याचा विषय आपल्या साथीने लावून धरला. वर्षाखेरीस तुळजाभवानी देवीच्या चरणी पश्चिम महाराष्ट्रातील पाणी येईल. कौडगाव आणि तामलवाडी एमआयडीसीचे काम पूर्ण केल्याखेरीज आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याचा विषय असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्न तेरणा उपसासिंचन दुरुस्ती योजना असे अशक्यप्राय असणारे अनेक विषय केवळ अडीच वर्षाच्या आपल्या महायुती सरकारच्या सत्ताकालावधीत आपल्या सर्वांच्या मदतीने पूर्ण करता आले.

पीकविमा, अनुदानासाठी तसेच कोविड काळात सर्वांनी मिळून केलेली कामे सर्व जनतेच्या समोर आहेत. यापुढेही जनहिताची आणि विकासाची कामे करण्यासाठी आपल्याला बळ मिळाले आहे. केवळ तुळजापूरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेकांच्या साथीने मोठे काम उभे करायचे आहे. केंद्रात आणि राज्यात पुन्हा आपलेच सरकार असणार आहे. त्यामुळे आपल्या स्वप्नातील, आपल्या मनातील जे धाराशिव आहे, जे तुळजापूर आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकतीने काम काम करण्यासाठी आपले सर्वांची साथ, मला हवी आहे..

#तुळजापूर #भाजपा

18/10/2024

४०० वर्षांची अभिमानास्पद परंपरा!

तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन काठ्यांना मोठा मान आहे. समाजाची उन्नती व्हावी, सुख, शांती, समृद्धी व्हावी तसेच प्लेग, पटकी, देवी यासारख्या रोगांपासून मुक्ती मिळावी यासाठी मागील ४०० वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने व आत्मीय श्रद्धेने ही परंपरा आजही सुरू आहे..

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या छबिन्यासाठी ही शिवलाड तेली समाजाच्या या काठ्या व पालखीला मान आहे. तुळजापूर देवस्थानकडून दरवर्षी छबिन्याचे आमंत्रण दिले जाते. आपल्या अभिमानस्पद परंपरेप्रमाणे सोलापुरातून या मानाच्या काठ्या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तुळजाभवानीच्या दरबारात दाखल झाल्या.

श्री.तुळजाभवानी मातेचा छबिना या काठ्यांसह मोठ्या उत्साहात काढला जातो. तुळजापूर आणि सोलापूरचे असे अनोखे नाते या अनोख्या धार्मिक परंपरेने चार शतकांपासून जोडले गेले आहे..

#तुळजापूर #तुळजाभवानी #धाराशिव

18/10/2024
17/10/2024

#नळदुर्ग: राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेचा प्रश्न मिटला : महायुती सरकारने विशेष बाब म्हणून घेतला निर्णय!

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे साकारल्या जाणार्‍या राज्यातील पहिल्या बसवसृष्टीच्या जागेसाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून नळदुर्ग पालिकेची स्मारकासाठी असलेल्या ६ एकर जागेच्या आरक्षण बदलाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच ५ कोटी रूपयांचा निधी बसव सृष्टीसाठी उपलब्ध झालेला आहे. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राज्यातील पहिली भव्यदिव्य आणि आकर्षक बसवसृष्टी आकाराला येणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे बसवसृष्टी उभारण्यासाठी ५ कोटी रूपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लावून धरली होती. याविषयी आपण सातत्याने पाठपुरावा करून नळदुर्ग जवळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेली वाहनतळासाठी आरक्षित जागा बसवसृष्टीसाठी मिळावी याकरिता सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.

नळदुर्ग शहराचा विकास आराखडा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याअंतर्गत वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या ६ एकर जागेवरील आरक्षण बदलून बसवसृष्टीसाठी देण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती. परंतु या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने या ६ एकर जागेसाठी विशेष बाब म्हणून आरक्षण बदलून देण्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली होती.

आपल्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून या जागेवर बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक स्मारकासह विस्तृत उद्यान उभारण्यासह इतर अनुषंगिक बाबीसाठी १०% जागेवर बांधकाम करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याने एकूण ६ एकर असलेल्या या जागेतील ५ एकर क्षेत्रावर महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा अश्वारूढ पुतळा, ध्यानकेंद्र, आकर्षक बागबगीचा, सुशोभिकरण, त्याचबरोबर लाईट अ‍ॅन्ड साऊंड-शो करण्याचे ठरविले आहे.

राज्यातील पहिली आकर्षक भव्यदिव्य अशी बसवसृष्टी या ठिकाणी आकाराला येणार आहे. तर उर्वरित १ एकर क्षेत्रावर हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे समारक आणि उद्यान विकसित केले जाणार आहे. हे ठिकाण एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून राज्याच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित करण्याचाही उद्देश आहे.

लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तो उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद.

#बसवसृष्टी #नळदुर्ग

16/10/2024

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावे!

जिल्ह्यात मागील २ दिवसात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी बांधवांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांकडे आग्रही मागणी करावी. तसेच पीकविमा कंपनीला ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती कळवावी.

रविवारी आणि सोमवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यापूर्वीही ३७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. राज्य सरकारकडे पीक नुकसानीचे अनुदान मागणीसाठी आताच्या पावसात नुकसान झालेल्या पिकांचे तलाठ्यांमार्फत पंचनामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे रितसर अर्ज देऊन पंचनाम्याची मागणी करून त्याची पोच आपल्याकडे ठेवावी.

तसेच पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाऊस झाल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवावी, म्हणजे आपल्याला भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर होईल. २४ तासात ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला किंवा सलग १० दिवस दररोज किमान १० मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला तर राज्य सरकारकडून आपल्याला पीक नुकसानीपोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

एप्रिल २०२१ चे परिपत्रक शेतकर्‍यांसाठी नुकसानकारक ठरणारे आहे. त्यामुळे पीक विम्याचा लाभ मिळणे शेतकर्‍यांसाठी अडचणीचे ठरणार होते. तरीही निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. लवकरच हे परिपत्रक रद्द होणार आहे. त्याची प्रक्रिया सध्या केंद्रीय कृषीमंत्री ना.श्री.शिवराजसिंह चौहान यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.

२०२०-२१ च्या पीक विम्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेत बुधवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ श्री.व्ही.डी.साळुंखे यांच्यामार्फत शेतकर्‍यांच्या हक्काचे ६५० कोटींची भरपाई आणि त्यावरील व्याज मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या न्यायालयीन प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. परंतु शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.

#धाराशिव #पिक_विमा

16/10/2024

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

कोजागिरी पौर्णिमा हा सजता आणि जागृती शिकविणारा उत्सव आहे.. आपल्या जीवनातही दुधाचा गोडवा व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णता येवो हीच सदिच्छा..

#कोजागिरी #पौर्णिमा

14/10/2024
14/10/2024
14/10/2024
14/10/2024

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

नकारात्मक विचार आणि भावनांवर सकारात्मकतेचा विजय म्हणजे विजयादशमी..

'अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे एकमेकांना सहाय्य करत आपल्यासह इतरांनाही विकासाच्या, प्रगतीच्या मार्गात आणण्याचा प्रयत्न करणे, मतभेदांच्या सीमा उल्लंघन करून सर्वांच्या समृद्धीचा प्रयत्न करणे हीच खरी विजयादशमी..

#दसरा

Address

Osmanabad
Murum
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay surpe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share