29/07/2018
एक विचार...
काल फार दुःखद घटना आंबेनळी घाटात घडली. ३४ तरुण महाबळेश्वरला निघाले होते पण त्यांची बस, चालकाचा ताबा सुटून आठशे फूट खोल दरीत पडली.
त्यात 32 जणांना आपला जीव गमवावा लागला.एका वेळी 32 जण गेले पण त्याच वेळी 32 कुटुंब ही उद्वस्त झाली होती.ते सगळे कोणचे तरी मुलगा, वडील , नवरा ,काका, मामा असतील...ही घटना ऐकली आणि मन अगदी हेलावून गेले.देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.
मला पडलेले काही प्रश्न आहेत ?
१. त्यांच्या पाठी राहिलेल्या परिवाराचा काय? त्यांच्याकडे किती जमापुंजी असेल?
२. जर आई, बाबा आणि बायको मुले असतील तर त्यांचे Monthly इनकम कसे व कुठून येणार?
३. मुलांची शिक्षण व लग्नाची जवाबदारी कोणाची?
४. किती जणांकडे 'टर्म इन्शुरन्स' असतील? किती जणांकडे लाईफ कंवर असतील?
फार विषणं करणारे प्रश्न आहेत हे पण मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे. आज मागे राहिलेल्या परिवारांचं काय हा यक्ष प्रश्न आहे?
आपण बरेचदा फक्त इन्व्हेस्टमेंट चा विचार करत असतो. इन्शुरन्सला महत्व देत नाही ! काय होणार आहे मला? याच भ्रमात राहतो इन्शुरन्स ला खर्च समजतो. लाईफ इन्शुरन्स म्हणून फार फार तर 2 आणि 5 लाख कव्हर खरेदी करतो त्यात आपल्या पाठी आपले घर चालणार आहे का याचा विचार करत नाही?
'टर्म इन्शुरन्स फार स्वस्थ इन्शुरन्स आहे पण पैसे फुकट जातील म्हणून बरीचशी लोक घेत नाहीत हे चुकीचे आहे.'
लक्षात ठेवा "आपण हयात असताना घरात जेवढे इनकम येते तेवढेच हयात नसताना येणे गरजेचे आहे आणि त्यासाठी टर्म इन्शुरन्स उत्तम पर्याय आहे." (टर्म इन्शुरन्स घेताना इनकम चा विचार करू नका, कव्हर चा विचार करा)
देव आंबेनळी घाटात जीव गमावलेल्या सर्वांच्या आत्म्यास शांती देवो आणि पाठी राहिलेल्या 32 परिवारांना शक्ती देवो.