08/03/2023
तुम्ही 1995 ते 2000 मधली बोरिवली पाहिली आहे का? मुलं शाळेच्या पिकनिक साठी यायचे गोरेगाव आणि बोरिवली मध्ये.
2005 मधलं मिरा रोड - पाहिलं आहे का? कशासाठी ओळख होती सांगायला नको - पण आठवतंय का?
2010 मधलं विरार - अगदी 2014, 15 पर्यंत विरार मध्ये राहण्याची हिम्मत होत नव्हती बऱ्याच जणांची. विरार मधल्या पिकनिक आता कुठे कमी झाल्या - कारण आता विरार ची लोकसंख्या येवढी जास्त आहे की त्यांच्याच शनिवार रविवारच्या पिकनिकची जागा माणसांनी गच्च भरलेली असते.
ज्याला आपण जंगल म्हणत, आपल्याला काहीतरी कळत असं म्हणत मोठमोठ्या बाता मारल्या - त्या कवडीमोलाने मिळत असलेल्या प्रॉपर्टी आज आपली पिढी खरेदी करू शकत नाहीये. पुढच्या पिढीसाठी हे अजून कठीण होत जाणार.
मागची 7-8 वर्ष प्रॉपर्टी च्या किमती वाढल्या नाहीत - 2012 पर्यंत पसा भरून वाहणारी रिअल इस्टेट अचानक बंद पडलेल्या इंजिनासारखी झाली.
पण, ज्यांनी लाँग टर्म चां विचार करून घर खरेदी केलं, ते सगळे खुश आहेत - घर हे पुढच्या पिढीसाठी करण्याची गुंतवणूक आहे - जसं आपले आजी आजोबांनी झाडं लावली अगदी तसच.
एकतर Long Term किंवा Flip - तिसरा कोणताही पर्याय फायदेशीर नसतो. भ्रमात जगणाऱ्या बऱ्याच मंडळींशी मागच्या काही महिन्यात बोलणं झालं - ज्या वस्तूची किंमत एक करोड आहे, ती 25, 30, 35 लाखात कशी आणि का मिळेल?
बँक ऑक्शन मध्ये 15 ते 20% पर्यंत किंमत कमी होते - त्यापेक्षा जास्त ची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
बोईसर म्हणजे 10 वर्षापूर्वीच मिरा रोड - आज काहीही interesting दिसत नाही
- आज सगळीकडे फक्त कन्स्ट्रक्शन दिसत
पण ठाणे, मिरा रोड, विरार आणि "बोईसर, पालघर" मध्ये एक fundamental फरक आहे - जो आज डोळ्यांनी दिसणं शक्य नाही.
तो फरक म्हणजे, इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट - आज बोईसर मध्ये एक लाख लोक रोज नोकरीसाठी येतात.
त्यांना घर हवंच ना?
बुलेट ट्रेन च्या बाबतीत आपलं राजकीय मत काहीही असेल - हो, मराठी माणसाची बोलताना राजकीय मत इतर कोणत्याही विषयापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं - हे दुर्दैवी असलं तरी खरं आहे.
असो, आपल्याला बुलेट ट्रेन हवी असली किंवा नको असली - तरी, ती तर येणार आणि सोबत व्यवसायाच्या, उद्योगाच्या मोठमोठ्या संधी बोईसर, पालघर, उमरोली या भागात घेऊन येणार.
अहमदाबाद, सुरत, वापी, उमरगाव नंतर बोईसर - काहीतरी लपलेलं दिसतंय का ह्या वाक्यात - Read Between the lines.