11/09/2022
साई येथे ॲग्रोसाई शेतकरी उत्पादक कंपनी व मानस फाऊंडेशन आयोजित शेतकरी मेळावा संपन्न झाला.
साई,ता.जि.लातूर येथे आज दिनांक १०/०९/२०२२ रोजी सकाळी १० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्यात "सेंद्रिय शेती-काळाची गरज" या विषयावर विचारमंथन करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून नैसर्गिक शेती अभ्यासक मा.श्री.श्रीपादजी कुलकर्णी व प्रगतशील शेतकरी श्री.संजीवनजी देशपांडे उपस्थित होते.
मेळाव्यास साईच्या सरपंच सौ.सुमित्राताई श्रीमंत माने व उपसरपंच अमोल श्रीपतराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांचा मानस फाऊंडेशन व ॲग्रोसाई शेतकरी उत्पादक कंपनी, साई यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा.श्रीपादजी कुलकर्णी यांनी पारंपरिक शेती, सेंद्रिय शेतीचा इतिहास, आजच्या शेतीची वाटचाल व दुष्परिणाम,सेंद्रिय शेतीचे महत्त्व आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.मार्गदर्शनानंतर शेतकरी बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
त्यानंतर प्रगतशील शेतकरी मा.संजीवनजी देशपांडे यांनी सेंद्रिय शेतीचे स्वतःचे अनुभव व्यक्त केले.
मेळाव्यास साई येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲग्रोसाई शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक मंडळ बलभीम शंकरराव पवार, गोविंद शालिकराव पवार, नवनाथ चंद्रशेखर पवार, बाळासाहेब राजे व मानस फाऊंडेशनचे संचालक व उपसरपंच अमोल श्रीपतराव पवार, वसुदेव संगितराव पवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग आत्माराम पवार, गोविंद भाऊसाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सिदाजी जगन्नाथ पवार यांनी केले.