22/02/2026
आज आरती म्हणत आहात,
उद्या नारळ फोडाल,
परवा नवस बोलाल,
नंतर अंगात येईल,
मग भोंदू महाराज येतील,
मग कर्तुत्वाला चमत्कार समजून,
तुम्ही एका दैदीप्यमान पुरुषाच्या कर्तुत्वावर पाणी फिरवाल...
भविष्यातील हा संभाव्य धोका ओळखून,
तात्काळ छत्रपती शिवरायांची आरती म्हणणे थांबवले पाहिजे.
शिवजन्मोत्सवी अनेक ठिकाणी पंचारती, कापूर अगरबत्ती लावून,आरतीचे ताट ओवाळत शिवरायांची आरती म्हणण्यात येत आहे..
हे थांबले पाहिजे...
भविष्यातील पिढीला आपण कोणते शिवराय देऊ इच्छितो...चमत्कारिक देव की कर्तृत्ववान महापुरुष..!
कारण एकदा दैवतीकरण झाले म्हणजे शिवरायांचा समग्र पराक्रम केवळ चमत्कारातून घडला,
असे म्हणायला येथील भोंदूबुवा कमी करणार नाहीत...
शिवाय आपल्याकडे 33 कोटी देव असताना, अजून एखाद्या देवाची आवश्यकता ती कशासाठी..?
मागे एका चित्रकाराने शिवरायांना अनेक हात असणारे चित्र रेखाटून शिवरायांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. काही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या चित्राचे भरभरून कौतुक देखील केले होते.
नेमके हे सर्व कशासाठी..?
शिवराय हे देव नाहीत..
शिवराय महामानव आहेत, महापुरुष आहेत.
मन, बुद्धी आणि मनगटाच्या बळावर, स्वकर्तृत्वातून, पराक्रमातून, संघर्षातून शिवरायांनी निर्माण केलेल्या दैदिप्यमान इतिहासामुळे शिवराय हे एखाद्या चमत्कारिक देव-देवतांपेक्षा निश्चितच कैक पटीने श्रेष्ठ ठरतात...
अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर,
अगदी 33 कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते..
तेव्हा अकारण, भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणे थांबवावे...
शिवराय हे जागतिक कीर्तीचे, महापराक्रमी महापुरुष,महामानव आहेत....!!
महत्वपूर्ण सूचना : शिवरायांच्या आरतीला पर्यायी जिजाऊ वंदना म्हणावी...
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
माझा महाराष्ट्र माझा अभिमान
#राजे #जयशिवराय