20/05/2025
*जव्हार अर्बन बँक रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधातून मुक्त, आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय*
दहा वर्षांपूर्वी अनियंत्रित कर्जांमुळे (एन.पी.ए.) आर्थिक अडचणीत सापडलेल्या जव्हार अर्बन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये 'सॅफ' (सुपरवायजरी ॲक्शन फ्रेमवर्क) अंतर्गत वर्गीकृत केले होते. त्यामुळे बँकेवर अनेक निर्बंध लादले गेले होते.
परंतु, लोकनेते श्री. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळाने प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करून नवीन व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली. या प्रयत्नांमुळे अल्पावधीत बँकेचा एन.पी.ए. ३६ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात यश मिळाले. त्यामुळे बँकेचा नफा वाढला व बँकेच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा झाली आणि गेल्या आर्थिक वर्षात बँकेने 'अ' श्रेणीचे ऑडिट रेटिंग प्राप्त केले.
बँकेच्या विद्यमान संचालक मंडळ आणि प्रशासनाने केवळ दोन वर्षांत केलेल्या या प्रभावी कामगिरीची दखल घेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जव्हार अर्बन बँकेला दशकभराच्या 'सॅफ'च्या बंधनातून नुकतेच मुक्त केले आहे. बँकेवरील मागील १० वर्षांचे सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. प्रसाद मुकणे यांनी दिली.
या निर्बंधांमुळे बँकेच्या ग्राहक आणि सभासदांना सुविधा व लाभ देताना अडचणी येत होत्या. मात्र, आता निर्बंधमुक्त झाल्यामुळे बँकेच्या जलद विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे, असे मत बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. निलेश पाटील यांनी व्यक्त केले.
संचालक मंडळ आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे बँकेवरील 'सॅफ'चे निर्बंध हटवण्यात यश आले असून, यापुढे बँकेला विकासाच्या उच्च शिखरावर नेले जाईल, असा विश्वास बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. वैभव अभ्यंकर यांनी व्यक्त केला.
बँकेचे संचालक आणि माजी व्हाईस चेअरमन प्रवीण राजाराम मुकणे म्हणाले की, आम्ही बँकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे दिलेले वचन पूर्ण केले आहे. निर्बंध हटल्यामुळे बँकेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी प्रलंबित निर्णय लवकरच घेतले जातील व यापुढे सभासदांना नियमित लाभांश (डिव्हिडंड) मिळेल. तसेच, लवकरच फोन पे आणि गुगल पे सारख्या आधुनिक यूपीआय सेवा सुरू करण्यात येतील. बँकेच्या नवीन शाखा उघडणे आणि कॉर्पोरेट विमा एजन्सी घेणे आता शक्य होणार आहे.
संचालक मंडळाच्या या निर्णयांचा बँकेचे ग्राहक, सभासद आणि भागधारक यांना मोठा फायदा होणार आहे. हे यश भागधारक, खातेदार आणि हितचिंतक यांच्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळेच शक्य झाले, असे सांगून * सर्व संचालकांनी त्यांचे आभार मानले.
तसेच लोकनेते मा. श्री. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळाने प्रशासनात लोकप्रिय_नेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेश सांबरे साहेब यांनी विद्यमान संचालक मंडळ व प्रशासन यांना ताकद दिल्यामुळेच हे कठीण कार्य अतिशय अप्लावधीत साध्य करून बँकेला आर्थिक संकटातून वाचवणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे विशेष आभार! 🙏🏼🙏🏼🙏🏼