05/02/2019
#भारतातील #पहिल्या #दि #अकोला #जिल्हा
#मध्यवर्ती #सहकारी #बँकेच्या #शताब्दीचा #संक्षिप्त
#इतिहास
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 108 वर्षाच्या सेवेची वारसा लाभलेली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील पहीली जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेचे अगदी आरंभीचे नांव दि अकोला सेंट्रल अर्बन बँक लि.,अकोला हे होते. सन 1908 मध्ये अकोला जिल्हयातील 12 प्रमुख समाजसेवी लोकांनी मिळून त्याकाळी अस्तित्वात असलेल्या 13 सहकारी संस्थांना कर्ज पुरविणारी सेंट्रल बँक, अकोला येथे काढावी, असा ठराव केला. तशी नोंदणी करण्यासाठी रीतसर अर्जही केला. त्या काळात मा.मि.हेमिंग्वे सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार होते. त्यांनी दि.5 फेबु्रवारी 1909 रोजी बँक रजिष्टर केल्याचे सर्टिफीकेट दिले.
भारतामध्ये 1904 साली सहकारी पतपेढयांचा कायदा पास झाल्यावर अकोला जिल्हयात सन 1908-09 पर्यंत वेगवेगळया प्रकारांच्या 13 सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या. सहकाराची तत्वे आणि सहकारी संस्थांचे महत्व लोकांना पटवुन देण्यासाठी सरकारने खास प्रचारक नेमले होते. लोकांची मने सहकाराला अनुकूल करण्याचे पुष्कळसे काम मा.के.पी.भट या अधिकाऱ्याने केले शासनाकडून सहकारी चळवळीला चांगलेच उत्तेजन मिळत असे अशा संस्था स्थापन करण्यात व त्यांना सफलतरा मिळवून देण्यात शासकिय अधिकारी तत्परतेने लक्ष घालीत असत. अर्थात अकोला जिल्हयात ज्या 13 सहकारी सस्था स्थापन करण्यात आल्या, त्याचा परस्परांशी काही संबध नसे. त्या संस्थांची सभासदद संख्याही पुष्कळ असल्याने त्यांना चालु गरजा भागविण्यासाठी लागणारा पैसा स्थानिक सावकारांकडून घ्यावा लागत असे. या संस्थांच्या कार्याचा व्याप जसजसा वाढू लागला तसतशी पैसे देणारी एखादी केंद्रीय पेढी असण्याची अधिकाधिक गरज भासू लागली. अशा कंद्री पेढीशी त्या सहकारी संस्था जोडून व तेथूनच सर्व संलग्न संस्थांना कर्ज पुरवठा व्हावा, असा त्या 13 सहकारी संस्थांचे चालक विचार करु लागले. त्याप्रमाणे विचार करणारे जिल्हयातील प्रमुख लोक सन 1908 च्या जानेवारी महिन्यात एकत्र जमले व अकोला जिल्हयासाठी को-ऑपरेटिव्ह सेंट्रल बँक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बारा प्रमुख लोकाच्या सहयांनी ही बँक को-ऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे रजिस्टर करण्यासाठी रीतसर अर्ज त्यांनी पाठवला. तो कायद्याप्रमाणे तपासल्यावर मंजूर करण्यात आला व त्या संबंधीचे अधिकृत रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर लिहिल्या प्रमाणे 5.2.1909 रोजी रजिस्ट्रार साहेबांची सही होऊन अकोला को-ऑप.सेंट्रल बँक नोंदली गेली.
गेल्या 108 वर्षाच्या कालखंडात बँकेच्या कारभारात पदाधिकारी बदलत गेल्यामुळे बदल घडून आला. सुरवातीला 1930 सालापर्यंत, ज्या मंडळींनी या बँकेची सुरुवात केली व तिला भक्कम पायावर आर्थिक दृष्टीने मजबू केले तो एक कालखंड म्हणावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या कालखंडात जेव्हा आर्थिक मंदी देशात निर्माण झाली व विशेषत: शेतकरी वर्गात शेतीतून उत्पादन अती कमी झाल्यामुळे व शेतमालाचे भाव पडल्यामुळे आपले कर्ज परत करु शण्यास असमर्थ ठरलेल्या लोकांच्य गहाण पडलेल्या अनेक जमिनी बँकेच्या मालकीच्या झाल्या.
आर्थिक मंदीमुळे 1930 ते 40 सालपर्यंतच्या कालावधीत बँकेचा आर्थिक कारभार जवळजवळ बंद होता, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. बँकेजवळ असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी व बँकेचे भाग भांडवल कर्जाचे रूपाने फसल्यामुळे या काळात बँकेजवळ पैशाऐवजी शेतीच भरभक्कम गोळा झाली होती. परंतु 1940 ते 1945 च्या कालावधीत बँकेने मोठया हिंमतीने व धीराने या संकटाला तोंड देऊन या आर्थिक अडचणीवर मात केली आणि जवळ असलेल्या सर्व जमिनी हळूहळू हप्तेवारीने किंवा संपूर्ण किंमत वसूल करून विकल्या. या 10 वर्षाच्या काळात पिकांची परिस्थिती सुधारली. तसे शेतमालाचे भावही वाढले व त्यामुळे शेतकरी मंदीच्या लाटेतून सहीसलामत, सुखरूप बाहेर पडला. बँकेचा कारभार ज्या मंडळीच्या हातात होता ती बहुतांश शहरात राहणारी सुशिक्षित वर्गापैकी होती. बँक उत्तम चालावी, बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असावी, आर्थिक कायदयाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज द्यावे हीच त्यावेळची विचारप्रणाली होती.
शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी समरस होऊन त्यांच्या खऱ्याखुऱ्या अडचणीचा अभ्यास करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मनपूर्वक आस्था बाळगून काम करणारी मंडळी 1950 सालानंतर हळूहळू या बँकेच्या संचालक मंडळावर येऊ लागली व त्यांना पदाधिकारी बनण्याचाही योग प्राप्त झाला. म्हणून 1950 पासून तो आजतागायत