Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Solapur
  • Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र

Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र “ब्रेकिंग महाराष्ट्र — महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकारण, सामाजिक, अर्थकारण आणि महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत. Follow करा आणि अपडेट राहा!”

सुविचार..!
29/05/2026

सुविचार..!

29/05/2026

तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ मध्ये! तीनच दिवसात ५३ धाडी, ३३ जण थेट तुरुंगात; एफडीएची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज...
28/05/2026

महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणारे, निकृष्ट दर्जाचे तूप आणि खवा तयार करणारे तसेच रसायनांचा वापर करून फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक सुरक्षिततेसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याचा घेतलेला हा एक आढावा..
28/05/2026

आर्थिक सुरक्षिततेसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याचा घेतलेला हा एक आढावा..

. बार्शी नगरपरिषदेचेविरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी घेतला विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज
26/05/2026

. बार्शी नगरपरिषदेचे
विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी घेतला विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज

निर्माते प्रविण तरडे यांनी स्पष्ट सांगितलं की ''देऊळ बंद २ चित्रपटाच्या कमाईचा सर्व नफा गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांच्या...
24/05/2026

निर्माते प्रविण तरडे यांनी स्पष्ट सांगितलं की ''देऊळ बंद २ चित्रपटाच्या कमाईचा सर्व नफा गोरगरीब शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी दान करणार....''

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या  निवडणूकीसाठी नीलम शिर्के सामंत रिंगणातगेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या अखिल भारत...
24/05/2026

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीसाठी नीलम शिर्के सामंत रिंगणात

गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक यंदा गाजण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप सुरू झाल्याची चर्चा असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के सामंत या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

रस्त्यावरील मैलाचे दगडाचे अर्थ..
23/05/2026

रस्त्यावरील मैलाचे दगडाचे अर्थ..

पोट साफ; तर सगळं माफ! आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे आजार ही घराघरातील मुख्य ...
23/05/2026

पोट साफ; तर सगळं माफ!

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे आजार ही घराघरातील मुख्य समस्या बनली आहे. अपचन, गॅस, आणि पोट फुगणे या त्रासांमुळे अनेकजण त्रस्त असतात. यावर सर्वात सोपा, मोफत आणि अत्यंत गुणकारी उपाय म्हणजे पवनमुक्तासन!

काय काय लाभ होतात या आसनाने?

१. गॅस आणि ॲसिडिटीपासून तात्काळ सुटका

जेव्हा आपण पवनमुक्तासन करतो; म्हणजेच पाय दुमडून पोटावर दाबतो; तेव्हा आतड्यांवर एक नैसर्गिक दाब निर्माण होतो. विज्ञानानुसार; या दाबामुळे आतड्यांमध्ये अडकलेला वायू अगदी सहज बाहेर पडतो. जर तुम्हाला नेहमी पोट फुगल्यासारखं वाटत असेल; तर हे आसन तुमच्यासाठी इन्स्टंट रिलिफ देणारे औषध ठरेल.

२. बद्धकोष्ठता होईल गायब

संशोधनात असं दिसून आलं आहे की; या आसनामुळे आपल्या पचनसंस्थेची हालचाल सुधारते. सोप्या भाषेत सांगायचं तर, हे आसन पोटातील मळ पुढे ढकलण्यास आतड्यांना मदत करतं. त्यामुळे ज्यांना सकाळी पोट साफ न होण्याची तक्रार आहे; त्यांनी रोज सकाळी हे आसन आवर्जून करायला हवे.

३. कंबरदुखी आणि पाठीचा कडकपणा यांवर रामबाण उपाय

आजकाल तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून अनेकांची कंबर आखडते. पवनमुक्तासन करताना पाठीच्या खालच्या भागाला खूप छान आणि खोलवर स्ट्रेच मिळतो. कंबरदुखी आणि पाठीचा कडकपणा कमी करण्यासाठी हे अतिशय सुरक्षित आणि प्रभावी आसन आहे.

४. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत

पवनमुक्तासनाचा थेट परिणाम आपल्या पोटाच्या स्नायूंवर होतो. पोटावर दाब पडल्यामुळे तिथले स्नायू टोन होतात आणि चयापचय क्रिया वेगवान होते. यामुळे पोटाभोवती जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

५. ताणतणाव कमी आणि मन शांत!

जेव्हा आपण या आसनात स्थिर राहून संथ श्वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर; यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते. पोट साफ राहिल्यामुळे आणि मन शांत झाल्यामुळे साहजिकच तुमचा पूर्ण दिवस एनर्जीने भरलेला राहतो.

आसन करताना ही काळजी नक्की घ्या:

हे आसन अतिशय सोपे असले तरी; ज्यांना नुकतीच पोटाची कोणती शस्त्रक्रिया झाली आहे, तीव्र स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा गरोदर महिलांनी हे आसन करू नये.

- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

जिंकण्याची खात्री की भविष्यातील गुंतवणूक? भाजपा काय निवडणार..?_____________________________________सोलापूर स्थानिक स्वरा...
22/05/2026

जिंकण्याची खात्री की भविष्यातील गुंतवणूक? भाजपा काय निवडणार..?
_____________________________________

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक ही भाजपसाठी केवळ उमेदवार निवडीची प्रक्रिया नाही; ती पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाचा कस पाहणारी राजकीय परीक्षा आहे. पोस्टरमध्ये दिसणारी चर्चा “दिग्गज चेहऱ्यांना पसंती की युवा चेहरा?” ही वरवर उमेदवारीची वाटली, तरी प्रत्यक्षात हा प्रश्न भाजपच्या पुढील राजकीय दिशेचा आहे.

राजेंद्र राऊत यांचे नाव आले की अनुभवी, संघटनात्मक पकड, स्थानिक स्वराज्य संस्थेतील विक्रमी विजय असलेला आणि स्थानिक समीकरणांमध्ये वजन असलेला चेहरा अशी प्रतिमा भाजपासमोर पुढे येते. अशा नेत्यांची ताकद म्हणजे त्यांचा थेट संपर्क आणि राजकीय व्यवस्थापनाची क्षमता. मात्र त्याचवेळी पक्षाला विचार करावा लागेल की अनुभवाच्या नावाखाली पुन्हा त्याच सत्ताकेंद्रांना बळ द्यायचे का, की नव्या सामाजिक व राजकीय संतुलनाला संधी द्यायची? राजेंद्र राऊत यांच्या दुहेरी क्षमतेमुळे भाजपाला तत्वाबाहेर विचार करायला भाग पाडणारी बाजू आहे.

राजन पाटील यांच्यासारखा चेहरा ग्रामीण राजकारण, सहकार आणि पारंपरिक मतदारसंघीय समीकरणांमध्ये प्रभावी ठरू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वैयक्तिक संपर्क, नातेसंबंध आणि गटबाजीचे गणित मोठे असते. त्यामुळे असा उमेदवार मतांचे व्यवस्थापन करू शकतो. पण भाजपसाठी अडचण अशी की केवळ स्थानिक प्रभाव पुरेसा नसतो; उमेदवार पक्षाच्या व्यापक प्रतिमेशी जुळणारा असावा लागतो.

प्रशांत परिचारक यांचे नाव आले की राजकीय घराणेशाही, स्थिर नेटवर्क आणि स्थानिक संस्थांवरील पकड या मुद्द्यांवर चर्चा होणे स्वाभाविक आहे. अशा उमेदवाराकडे निवडणूक लढवण्याची क्षमता असते, पण प्रश्न हा आहे की भाजप पुन्हा पारंपरिक राजकीय घराण्यांवर अवलंबून राहणार का? पक्षाने जर “नवीन नेतृत्व” हा संदेश द्यायचा असेल, तर अशा नावांबाबत सावध राजकीय मोजमाप करावे लागेल.

राम सातपुते हे तुलनेने आक्रमक, संघटनाशी जोडलेले आणि तरुण मतदारांमध्ये ओळख निर्माण करणारे नेतृत्व मानले जाते. त्यांची शैली थेट आणि संघर्षात्मक आहे. अशा नेतृत्वाचा फायदा म्हणजे पक्षाला कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा मिळते. पण विधान परिषद निवडणूक ही रस्त्यावरच्या लढाईपेक्षा अधिक सूक्ष्म राजकीय व्यवस्थापनाची असते. स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांचे गणित, गटांतर्गत संवाद आणि शांत समन्वय हे येथे तितकेच महत्त्वाचे असते.

रोहन देशमुख यांच्यासारख्या युवा चेहऱ्याचा पर्याय भाजपसाठी प्रतिमात्मकदृष्ट्या आकर्षक ठरू शकतो. नव्या पिढीला संधी, बदलाचा संदेश आणि भविष्यकालीन नेतृत्वनिर्मिती हे सर्व मुद्दे त्यांच्या बाजूने जाऊ शकतात. पण युवा चेहऱ्याला केवळ वयामुळे उमेदवारी देणेही धोकादायक ठरू शकते. स्थानिक पातळीवरील स्वीकारार्हता, मतदारांशी थेट संपर्क आणि राजकीय परिपक्वता यांची कसोटी तितकीच महत्त्वाची आहे.

या निवडणुकीत भाजपसमोर मुख्य प्रश्न असा आहे की “जिंकण्याची खात्री” आणि “भविष्यातील गुंतवणूक” यापैकी कोणत्या निकषाला प्राधान्य द्यायचे? दिग्गज चेहऱ्यांकडे अनुभव आणि जाळे आहे; युवा चेहऱ्याकडे ऊर्जा आणि नव्या राजकारणाचा संदेश आहे. पण फक्त चेहरा बदलून राजकारण बदलत नाही.

उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांशी किती जोडलेला आहे, गटबाजी किती रोखू शकतो आणि पक्षातील नाराजी किती नियंत्रणात ठेवू शकतो, हेच निर्णायक ठरणार आहे. भाजपने येथे चूक केली, तर ही निवडणूक केवळ एका जागेचा पराभव ठरणार नाही; ती सोलापूरमधील स्थानिक नेतृत्वाच्या असंतोषाची सुरुवात ठरू शकते. आणि योग्य उमेदवार दिला, तर ही निवडणूक पक्षासाठी भविष्यातील जिल्हा राजकारणाची मजबूत पायाभरणी ठरू शकते.

म्हणूनच या वेळी भाजपने लोकप्रियता, जातीय समीकरण, आर्थिक ताकद किंवा गटबाजी यापैकी एका घटकावर निर्णय न घेता, स्वीकारार्हता आणि विश्वासार्हता यांचा संगम साधणारा उमेदवार निवडणे आवश्यक आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक ही जनतेच्या थेट लाटेवर जिंकली जात नाही; ती सूक्ष्म संपर्क, विश्वास आणि राजकीय संयमावर जिंकली जाते.

सोलापूरमध्ये भाजपसाठी खरी लढाई विरोधकांशी कमी आणि स्वतःच्या उमेदवारीच्या निर्णयाशी जास्त आहे. चेहरा कोणताही असो, पक्षाने संदेश स्पष्ट द्यायला हवा उमेदवार हा केवळ गटाचा नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय विश्वासाचा प्रतिनिधी असला पाहिजे.

✍️ -

Address

Patil Plot , Shivajinagar Barshi Dist Solapur
Solapur
413411

Telephone

+919423526187

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Breaking Maharashtra ब्रेकिंग महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share