Health insurance specialist STAR Health

20/04/2026
08/02/2026

तुम्हाला माहिती आहे का आता अनलिमिटेड आरोग्य विमा संरक्षण दिले जाते
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8698405919

*२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त* *माझ्या तमाम देश वासियांना हार्दिक शुभेच्छा*🇮🇳🇮🇳💐💐www.licanand.com
26/01/2026

*२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त*
*माझ्या तमाम देश वासियांना हार्दिक शुभेच्छा*🇮🇳🇮🇳💐💐
www.licanand.com

शुभ सकाळ
08/08/2024

शुभ सकाळ

आज सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते अवलिया कलाकार श्री.मकरंद अनासपुरे यांच्याशी अनपेक्षित भेट
30/07/2024

आज सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते अवलिया कलाकार श्री.मकरंद अनासपुरे यांच्याशी अनपेक्षित भेट

31/05/2024

शाळेत नाव घालण्यासाठी जन्मतारीख ठरवलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

27/05/2024

दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे खुप खुप अभिनंदन.

05/05/2024

*भारतामध्ये प्रथमच जमिनीचे तापमान 62 डिग्री पर्यंत नोंदवले गेले आहे. वाचताना सोपं वाटत असलं तरी याचे होणारे परिणाम अतिशय भयानक आहेत* १. यामध्ये सर्वसामान्य माणसे, पशुपक्षी सर्वांनाच जगणे मुश्कील होईल. जलस्तोत्र आटुन जातील, भूगर्भातील पाणीही कमी होईल व त्याची नांदी ती हळूहळू वृक्ष वठणे , जमिनीमधील आद्रता निघून गेल्याने जमीन अति शुष्क होऊन झुडपे वेली या हळूहळू मरू लागतील व त्यामुळे सर्वच जैवविविधता टप्प्याटप्प्याने नष्ट होऊ शकते.

याच्या पुढील चक्रात अति उष्णतेने जे पाणी आटून गेले आहे त्याच्या वाफेने अतिशय भयानक प्रमाणात अति मुसळधार पाऊस होऊन सुपीक जमीन वाहून जाणार व याने जवळपासचे लहान-मोठे बंधारे व मोठी धरणे गाळाने भरणार. त्याचा थेट परिणाम जलसाठा व जलविद्युत प्रकल्प यावरही होईल. जमिनीचा कस निघून गेल्याने हळूहळू अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ लागेल व पुढील काही वर्षातच महागाई आकाशाला भिडेल. हा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त असला तरी अतिउष्णतेच्या काळात झाडांचे झालेले नुकसान हा पाऊस भरून काढू शकणार नाही असे दिसते.

याला कारण एकच :- मागच्या व आपल्या पिढीने केलेली भयानक वृक्षतोड ,डोंगरफोड, गायराने, पाणथळ जागा, कांदळ वने, ग्रासलँड म्हणजे गवताळ कुरणे यांचा झालेला अपरिमित नाश.

जंगलांच्या जमिनी यामध्ये सतत होणारे बांधकामे खोदकामे, प्रचंड दाट झाडी असलेल्या डोंगरांना मुद्दाम आग लावून यामध्ये खाण काढणे अथवा कोळसा बनवणे, रापण करून शेती करणे यासारखे उद्योग मानव करत आहे.

अहो अति उष्णतेने आणि नंतर अतिवृष्टीने पिकं मेल्यावर शेतकरीसुद्धा जे काय उरलंसुरलं धान्य आहे ते आपल्या पोटच्या पोरांसाठी घरी ठेवेल, बाजारात विकणार नाही. तर साहेबांनो, तुमच्या घरी जे काही लाखो करोडो रुपये, सोन्या-चांदीच्या विटा, क्रिप्टो करन्सी, एप्पल चे फोन ठेवलेली आहे हे तुम्ही कशा पद्धतीने खाणार आहात? म्हणजे तळून वितळवून अजून याची माहिती कृपया द्यावी ही विनंती.

जागतिक तापमान वाढीचे दुष्टचक्र सुरू झालेले आहे, याला थांबवता येणार नाही मात्र सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास हे थोडे लांब ठेवता येऊ शकते व यासाठी सर्वांनी मिळून जास्तीत जास्त झाडे लावून जगवणे व त्याच बरोबर आहे ते एक एक झाड मौल्यवान म्हणून सांभाळणे हेच केले पाहिजे. जर एकट्याने झाडे लावून सांभाळणे होत नसेल तर आजच आपल्या आपल्या भागातील विविध संस्था ज्या मोकळ्या जागांवर व डोंगरांवर वृक्षारोपण करत असतात त्यांची माहिती घेऊन त्यांना सामील व्हा. जेणेकरून एका मोठ्या ग्रुपमध्ये काम झाल्याने झाडे वाचायची शक्यता किती तरी पटीने वाढते.

निसर्गाचा रर्हास जर असाच चालू राहिला व जागतिक तापमान वाढीने महागाई अन्नधान्य टंचाई झाली तर पुढे जगणेच कठीण होईल ह्याची जाणीव जनमानसात निर्माण होऊ दे.

खास बातमी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी:- जागतीक तापमानवाढीने बर्फ वितळणे जोरात सुरू असल्याने पुढील काही वर्षातच समुद्र पातळी उंचावल्याने समुद्र किनारी वसलेली बहुतांश शहरे जलमय होणार आहेत.

जागतिक तापमान वाढीचे सत्य हे घाबरवणारेच आहे. सत्य स्वीकारा. कोशातून बाहेर या आणि पर्यावरण वाचवा यासाठी जास्तीत जास्ती धडपड करायला लागा.

आताही वेळ गेलेली नाही....आपण स्वतः झाडे लावा, झाडे जगवा हा कार्यक्रम पुर्ण क्षमतेने घराघरात आमलात आणल्यास भविष्य काळात,तुमच्या पुढच्या पिढीला हिरवागार निसर्गाची साथ लाभेल...अन्यथा सर्व काही येणारा काळ सांगेल व आपली पुढील पिढी रोज आपणास शिव्या घातल्या शिवाय राहाणार नाही.
निसर्ग वाचला तर देश वाचेल...देश वाचला तर आपण वाचू...

26/04/2024

चाळिशीनंतर पुरुषांच्या शारीरिक समस्या.

मोनोपॉज चा काळ सुरु होतो म्हणूनच स्त्रियांनी चाळशीनंतर आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल नेहमीच बोललं जातं परंतु पुरुष मंडळी चाळीशी ओलांडताना काय काय फेस करत असतात यावर फारसे कोणीही बोलताना दिसत नाही. कदाचित ते पुरुषांच्या masculine इमेजला मारक असेल.

वयोमानानुसार पुरुषामध्ये विशेषतः वयाच्या चाळिशी नंतर अनेक बदल दिसू लागतात. सारखी थकावट जाणवणे , केस पातळ होणं, टक्कल पडणे , चयापचयाशी संबंधित तक्रारी, दाताच्या तक्रारी, कामेच्छा कमी होणे ,चष्म्याचा नंबर वाढणे असे बदल जाणवू लागतात. याचे मुख्य कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणं हे आहे.

चाळिशीनंतर शरीराचं डी-जनरेशन सुरू होतं. त्याला पुरुषांमधली रजोनिवृत्ती किंवा अँड्रोपॉज (Andropause) म्हणतात. या बदलांचा स्वीकार करणे पुरुषांना साहजिकच कठीण असते.

आपण चिरतरुण आणि तब्येतीनं ठणठणीत राहावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं पण वयाच्या चाळीशी नंतर गाडी घसरगुंडीला लागते. पण चांगली बातमी अशी आहे की ह्या घसरगुंडीवरुन खाली घसरायचा स्पीड कमी करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

त्याबद्दल काही टिप्स.

१] दर वर्षी संपूर्ण चेकअप करून घेणे. Thyrocare किंवा metropolis चे ८४ टेस्टचे पॅकेज आहे ज्यातून आपल्याला Vit b12 , Vitamin D, fasting ,pp , Ecg ,x ray chest, Liver function tests, Kindney tests , Lipid profile हे सर्व करून मिळेल.
२] बहुतांश वेळी vitamin b १२, D याची कमतरता असतेच, जर असेल तर गोळ्या सुरु करणे.
३] जर Vitamin D ची कमतरता असेल तर तर कॅल्शियम देखील नीट शोषला जाणार नाही ज्याने हाडांचा ठिसूळपणा वाढतो. त्यासाठी सूर्यस्नान महत्वाचे.
४] ब्लड प्रेशर देखील २-३ महिन्यात एकदा चेक करणे. हा छुपा रुस्तम आहे.
५] कॅल्शियम, फायबर, झिंक मॅग्नेशिअम आणि आयर्नने परिपूर्ण असणारा आहार अत्यंत आवश्यक आहे.
६] वजन नियंत्रित राहायलाच हवे. माझे वजन जास्त असले तरी मी फिट अँड फाईन आहे , खाऊन-पिऊन आहे असली वाक्ये चालणार नाहीत.
७] चौरस , समतोल ,योग्य त्या वेळेत आहार याला काहीही ऑप्शन नाही. निदान बॉडी वेट इतके ग्रॅम प्रोटीन इन टेक हवाच.
८] चाळीशीनंतर प्रोस्टेटच्या तक्रारी सुरु होतात त्यासाठी व्हिटॅमिन चे भांडार असलेल्या एका लिंबाचा रस(किमान ) तरी दिवसभरात पोटात जायलाच हवा.प्रोस्टेटचा धोका कमी नक्कीच कमी होऊ शकतो.
९] अल्कोहोलचे प्रमाण एकदम कमी तर निकोटीनचे सेवन संपूर्ण बंद.
१०] रोज १५ मिनिटे मेडीटेशन म्हणजे ध्यान हवेच.
११] सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे रोज एक तास वर्क आऊट हवाच. काहीही पर्याय नाही.
यामध्ये नुसते वॉक, रन, सायकल उपयोगी नाही.
कमी होत असलेले मसल मास मेन्टेन करण्यासाठी वेट ट्रेनिंग देखील हवेच.

मित्रांनो , चाळीशी नंतर मुले वयात येत असतात , त्यांचे करिअरकडे वेध लागलेले असताना आपली तब्येत चांगली राहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. नाही का...?

ओम् नमः शिवाय
08/03/2024

ओम् नमः शिवाय

Address

Pune
411017

Telephone

+918698405919

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health insurance specialist STAR Health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Health insurance specialist STAR Health:

Share