02/10/2023
Post-002
Non-toxic farming revolution
गेले दोन वर्ष एक गोष्ट खूप ठिकाणी निदर्शनास आली. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात आणि बाजारात विकण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या पिकवतात. यामागे त्यांची कारणे वेगवेगळी आहेत, ती बरोबर आहेत की नाही हे माहिती नाही पण त्यांना चूक म्हणता येणार नाही. हे असं का करता असं त्यांना विचारल्यास त्यांचे उत्तर असं होतं की, 'हे असलं विष आपल्या लेकरा बाळांना खायला घालायचं काय?'...
एका गावांमध्ये तर ऐरणीच्या देवाचा साक्षात्कार झाला. केमिकल खते विकणाऱ्या विक्रेता एका सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून घरी लागणारा भाजीपाला घेत होता. त्यांना विचारलं असता त्यांचे उत्तर होते की, 'हा व्यवसाय आहे. पण कुटुंब म्हणून काही जबाबदारी आहे की नाही. सगळं माहिती असून परत तेच खायचं होय'.
आता कुटुंब म्हणून त्यांची जबाबदारी आहे, तशी आपली पण आहे. ज्यांची शेती नाही, शेतीशी काही संबंध नाही, जवळच्या मंडईमध्ये जाऊन खरेदी करणे याशिवाय कोणताही पर्याय नाही, अशी लोके विषमुक्त अन्न डिझर्व करत नाहीत का??
मला असं वाटतं, प्रत्येक जातीचा, धर्माचा, पक्षाचा;
अगदी पैशाने गरीब असलेला गरीब, पैशाने गरीब असलेला श्रीमंत, पैशाने श्रीमंत असलेला गरीब, पैशाने श्रीमंत असलेला श्रीमंत सर्वजण विषमुक्त अन्न डिझर्व करतात.
मग डिझर्व करतात तर ते देणार कोण..
हरितक्रांती ह्यावर सविस्तर गप्पा होतील पण त्यावेळी आपण एक वेळ मारून जायचे म्हणून पुढे गेलो. 'लोक उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडून मेलेली बरी' हा प्रकार सुरु झाला पण थांबला नाही आणि आता वेळ निघून गेली. अराजकीय पोस्ट आहे म्हणून कुणावरही टीका नाही. पण कोणतेही सरकार यावरती काहीही करू शकत नाही. कारणे खूप व्यापक आहेत, रिस्क खूप मोठी आहे आणि श्रीलंकेचे उदाहरण समोर आहे.
जे काही करायचे आहे, ते तुम्हाला मला आणि आपल्याला करायचे आहे.
आपण करू शकतो...
(जेव्हा मुद्दा व्हॅलिड वाटेल आणि जे काही करत आहे त्यामागील उद्दिष्ट व हेतू प्रामाणिक आहे असे वाटेल तेव्हा संपर्क करा...... सोबत पुढे जाऊ)
- ओंकार कामत
7387349075